पुष्पौषधी

पुष्पौषधी

१. प्रस्तावना

‘पुष्पौषधी’ या औषधोपचार पद्धतीचा शोध डॉ. एडवर्ड बाश, (एम्.बी.बी.एस्.), लंडन यांनी लावला. ‘साधी आणि सोपी उपायपद्धत (औषधोपचार पद्धत) असावी’, या हेतूने त्यांनी आपला चांगला चाललेला व्यवसाय बंद केला आणि पुढील शोधासाठी ते जंगलामध्ये गेले. हळूहळू फुलांचे औषधी उपयोग त्यांच्या लक्षात आले. त्यांनी जवळ जवळ ४० वर्षे या पद्धतीचा अभ्यास केला आणि ३९ प्रकारची औषधे सिद्ध केली. या पॅथीचा अभ्यास करत असतांना त्यांनी निसर्गाची पुढील तत्त्वे विचारात घेतली.

आधुनिक वैद्य प्रवीण मेहता

अ. निसर्ग नेहमी पूर्णत्वाच्या दिशेने काम करतो.

आ. निसर्ग पुष्कळ प्रमाणात निर्मिती करतो.

इ. निसर्गाचे मार्ग पुष्कळ सोपे असतात.

ई. नैसर्गिक मार्ग हे नित्यस्वरूपी असतात.

हे जर सत्य असेल, तर निश्‍चितच ‘निसर्गाने कोणतेही दुष्परिणाम न करणारी आणि स्वतःच स्वतःवर उपचार करता येतील, अशी उपचारपद्धत उपलब्ध करून ठेवलेली असावी’, असा विचार झाला. ही उपचारपद्धत म्हणजे ‘पुष्पौषधी’ होय. यामध्ये ३९ औषधे असून ती अरण्यामध्ये उगवणार्‍या फुलांपासून सिद्ध केलेली आहेत. ही सर्व औषधे नैसर्गिक स्वरूपामध्ये असून त्यांचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. या पद्धतीमुळे व्यक्तीमत्त्वामध्ये पालट घडून येतात. या पद्धतीमध्ये व्यक्तीमत्त्वानुसार औषध दिले जाते.

२. पुष्पौषधींची वैशिष्ट्ये

२ अ. स्वरूप

१. यामध्ये केवळ ३९ औषधे आहेत.

२. सर्व औषधे समजण्यास सोपी आहेत.

३. ही औषधे गोड गोळ्यांच्या स्वरूपामध्ये उपलब्ध आहेत.

२ आ. औषधे घेण्याची पद्धत

१. या औषधांना खाण्या-पिण्याची कोणतीही बंधने नाहीत.

२. या औषधांना (Contra-indications) नाहीत, म्हणजे ‘ही औषधे कुणाला देऊ नयेत’, असे कुठेही सूचित केलेले नाही. सर्वांनाच ती लागू आहेत.

३. ही औषधे कोणत्याही वेळी घेतली, तरी चालतात. ‘ती खाण्यापूर्वी किंवा खाण्यानंतर घ्यावीत’, असे कोणतेही बंधन नाही. ती चहा, कॉफी, पिण्याचे पाणी यांमध्ये मिसळून घेऊ शकतो. त्यामुळे त्यांची चव पालटत नाही.

४. ही औषधे केवळ चघळून खायची असतात.

५. ही ५ प्रकारची औषधे एकावेळी एकत्रितपणेही घेऊ शकतो.

६. ही औषधे व्याधीच्या (आजाराच्या) स्वरूपाप्रमाणे दिवसातून अनेक वेळा घेता येतात. दीर्घ आजारांमध्ये दिवसातून एक किंवा दोन वेळा घ्यावीत.

७. ही औषधे नवजात शिशूपासून वृद्ध व्यक्तीपर्यंत कोणीही, तसेच गर्भवती महिलाही घेऊ शकतात.

२ इ. औषधे टिकण्याचा कालावधी

१. ही औषधे मुदतबाह्य होत नाहीत. ती कितीही वर्षे टिकू शकतात.

२. ही औषधे सुरक्षित असून त्यांचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत.

२ ई. या औषधांचा परिणाम त्वरित दिसून येतो.

– संकलक : होमिओपॅथिक वैद्य प्रवीण मेहता, सनातन आश्रम, देवद, पनवेल.(११.८.२०२०)

या पुष्पौषधीच्या संदर्भात वाचकांना काही शंका विचारायच्या असल्यास अथवा त्या संदर्भात अधिक जाणून घ्यायचे असल्यास त्यांनी त्या संदर्भातील माहिती पुढील संगणकीय अथवा टपाल पत्त्यावर पाठवावी.

संगणकीय पत्ता : [email protected]

टपाल पत्ता : डॉ. प्रवीण मेहता, द्वारा सनातन आश्रम, १०७, सनातन संकुल, देवद,

पोस्ट : ओ.एन्.जी.सी., तालुका – पनवेल, जिल्हा – रायगड. ४१० २२१