रत्नागिरी – येथील जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आंबा वाहतुकीला अनुमती दिली आहे. आंबा वाहतुकीसाठी तालुका कृषी अधिकारी अथवा जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडून १ आठवड्याकरता ‘पास’ मिळणार आहे. यासाठी आंबा वाहतूक करणार्यांनी प्रशासनाकडे अर्ज केल्यावर आंबा वाहतुकीसाठी ‘डिजिटल’ अनुमती मिळणार आहे. अर्ज करतांना गाडीचा नंबर, कुठून कुठे जाणार ? ड्रायव्हरचे नाव, लायसेन्स आदी माहिती अर्जामध्ये भरायची आहे. अडचण आल्यास संबंधित जिल्हा अधीक्षक रत्नागिरी अधीकारी घोरपडे, तालुका अधिकारी विनोद हेगडे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
आंबा वाहतुकीला जिल्हाधिकार्यांकडून अनुमती
नूतन लेख
World Soil Day : मातीतील जैवविविधता नष्ट झाली, तर संपूर्ण सृष्टीचक्र बिघडून जाईल ! – विकास धामापूरकर, शास्त्रज्ञ
Indian Navy Day 2023 : नौदलाकडून स्थानिक प्रशासकीय अधिकार्यांचा सन्मान !
लाचखोरीच्या प्रकरणी रेल्वेच्या २ अधिकार्यांना अटक
Corrupt ED : तमिळनाडूमध्ये अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकार्याला २० लाख रुपयांची लाच घेतांना अटक
अक्षम्य हलगर्जीपणा !
विनाअनुमती कार्यक्रम घेतल्याच्या प्रकरणी मुख्याध्यापिकेला ‘कारणे दाखवा’ नोटीस ! – उपायुक्त दत्तात्रेय घनवट, शिक्षण विभाग, नवी मुंबई महापालिका