रत्नागिरी – येथील जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आंबा वाहतुकीला अनुमती दिली आहे. आंबा वाहतुकीसाठी तालुका कृषी अधिकारी अथवा जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडून १ आठवड्याकरता ‘पास’ मिळणार आहे. यासाठी आंबा वाहतूक करणार्यांनी प्रशासनाकडे अर्ज केल्यावर आंबा वाहतुकीसाठी ‘डिजिटल’ अनुमती मिळणार आहे. अर्ज करतांना गाडीचा नंबर, कुठून कुठे जाणार ? ड्रायव्हरचे नाव, लायसेन्स आदी माहिती अर्जामध्ये भरायची आहे. अडचण आल्यास संबंधित जिल्हा अधीक्षक रत्नागिरी अधीकारी घोरपडे, तालुका अधिकारी विनोद हेगडे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
आंबा वाहतुकीला जिल्हाधिकार्यांकडून अनुमती
नूतन लेख
‘वज्रलेप’ करणाऱ्या व्यक्तींवर गुन्हा नोंद करून कारवाई करावी ! – भाविक वारकरी मंडळाचे निवेदन
महापालिकेच्या शाळा क्रमांक १ च्या ‘डिजिटल वर्गा’चे लोकार्पण !
अकार्यक्षम अधिकाऱ्यांवर कारवाई हवीच !
बाल आणि किशोरवयीन कामगारांना कामास ठेवू नये ! – साहाय्यक कामगार आयुक्त, सातारा
सातारा नगरपालिकेची ४.५ कोटी रुपयांची देयके थकित !
सातबाऱ्यावर नोंद करण्यासाठी ४ सहस्र रुपये स्वीकारतांना तलाठ्यांना अटक !