भाजीपाला घरपोच देण्याविषयीही विचार चालू

सातारा, २६ मार्च (वार्ता.) – पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केल्याप्रमाणे देश लॉकडाऊन असतांनाच्या कालावधीत नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची आवश्यकता भासणार आहे; मात्र नागरिकांनी घाबरून न जाता संयम बाळगावा. जिल्हा प्रशासन आणि पोलीस नागरिकांची योग्य ती काळजी घेत आहेत. सातारा शहर आणि उपनगरे येथील किराणा माल दुकानदारांची सूची जिल्हा प्रशासनाने सिद्ध केली आहे, अशी माहिती सातारा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. माधवी कदम यांनी ‘व्हॉट्सअॅप’द्वारे कळवली आहे.
नागरिकांनी भ्रमणभाषद्वारे किंवा र्व्हॉट्सअॅप’द्वारे साहित्याची सूची दुकानदारांना द्यावी. साहित्य भरल्यावर दुकानदार आपणास कळवतील किंवा आपल्या मागणीनुसार ते साहित्य घरपोच देतील. यापुढे भाजीपाला घरपोच कसा देता येईल, याविषयी प्रशासन विचार करत असून नागरिकांच्या आरोग्यासाठी ही सर्व उपाययोजना केली जात आहे. तरी नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष कदम यांनी केले आहे.
पुणे रेल्वेस्थानकातील अवैध विक्रेत्यांवर कारवाई !
राज्यातील १ सहस्र १६४ शाळांमध्ये विद्यार्थिनींसाठी स्वच्छतागृहांचा अभाव !
Karnataka Minister Priyank Kharge : (म्हणे) ‘जगभरातील तंत्रज्ञान क्षेत्र वेगाने पुढे जात असतांना सरकार ‘आयआयटी’ संस्थांना ज्योतिष, पुनर्जन्म आदींचे संशोधन करण्यास जुंपत आहे !’
कोलकाता : ‘इस्कॉन’ने शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यान्ह भोजनातून अंडे हटवल्याने वाद !
निकृष्ट दर्जाच्या सुपारीवर अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई
मुख्य आरोपींवर ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करणार !