
ईश्वरपूर (जिल्हा सांगली), २४ मार्च (वार्ता.) – शहरातील ४ जणांना कोराना झाल्याचे समजल्यावर शहरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हे सर्व एकाच कुटुंबातील असल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. याच समवेत शहरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. रस्त्यावर अनावश्यक फिरणार्यांना चोप देण्यात येत आहे. कोरोनाचा प्रसार शहराबाहेर वाढू नये म्हणून शहराचा संपूर्ण तालुक्याशी संपर्क तोडण्यात आला आहे. शहरात येणार्या ५ मार्गावर नाकाबंदी करण्यात आली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर सर्व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी परिस्थितीचा आढावा घेत आहेत. नगरपालिकेने शहरात औषध फवारणी चालू केली आहे. नागरिकांनी दक्षता घेण्याचे आव्हान मुख्याधिकारी प्रज्ञा पवार यांनी केले आहे.
आहारात साखर, तेल अल्प करा आणि व्यायामावर भर द्या ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
शासकीय कार्यालयांत ‘केवळ नामधारी’ ही मराठी भाषा अधिकार्यांची ओळख पुसण्यासाठी होणार प्रयत्न !
अन्न-औषध विभागाकडून राज्यभरात गुटखामाफियांवर धाडी !
स्तनदुखी आणि स्तनातील गाठी : कारणे अन् आयुर्वेदाचा दृष्टीकोन
रत्नागिरी जिल्ह्यातील ८७ सहस्र ८६२ नागरिक तंबाखूमुक्त !
वेश्याव्यवसाय संपवणे हा आमचा उद्देश नाही; कायदा केवळ त्याच्या व्यापारीकरणाच्या विरोधात ! -Supreme Court