ईश्वरपूर (जिल्हा सांगली), २४ मार्च (वार्ता.) – शहरातील ४ जणांना कोराना झाल्याचे समजल्यावर शहरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हे सर्व एकाच कुटुंबातील असल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. याच समवेत शहरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. रस्त्यावर अनावश्यक फिरणार्यांना चोप देण्यात येत आहे. कोरोनाचा प्रसार शहराबाहेर वाढू नये म्हणून शहराचा संपूर्ण तालुक्याशी संपर्क तोडण्यात आला आहे. शहरात येणार्या ५ मार्गावर नाकाबंदी करण्यात आली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर सर्व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी परिस्थितीचा आढावा घेत आहेत. नगरपालिकेने शहरात औषध फवारणी चालू केली आहे. नागरिकांनी दक्षता घेण्याचे आव्हान मुख्याधिकारी प्रज्ञा पवार यांनी केले आहे.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > ईश्वरपूर येथे कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने शहरात भीतीचे वातावरण
ईश्वरपूर येथे कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने शहरात भीतीचे वातावरण
नूतन लेख
कोरोना महामारीच्या काळात खरेदी केलेल्या २५ कोटी रुपयांच्या रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या कुप्या (वायल्स) कालबाह्य !
भारत उत्पादनात, तर पाकिस्तान मधुमेहाच्या आजारात जगात अव्वल !
देशाचे आरोग्य स्वस्थ आणि बलशाली होण्यासाठी तंबाखू अन् तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाला विरोध आवश्यक !
रुग्णाला मालवण येथून सिंधुदुर्गनगरी येथे नेतांना रुग्णवाहिका बंद पडल्याने आरोग्य यंत्रणेची धावपळ
मशिदींवरील ध्वनीक्षेपकांद्वारे होणार्या ध्वनीप्रदूषणाच्या तक्रारींवर कारवाई न होणे, हा न्यायालयाचा अवमान !
एकाच खांद्यावर वजन किंवा पिशवी घेणे टाळावे !