
नवी मुंबई, २४ मार्च (वार्ता.) – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने ३१ मार्चपर्यंत ‘लॉकडाऊन’ घोषित केला असून या कालावधीत नागरिकांच्या आरोग्य हिताच्या दृष्टीने न्यूनतम संपर्कात येणे, त्याचप्रमाणे गर्दी टाळणे आवश्यक आहे. या दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, आपले स्वत:चे आणि इतरांचे आरोग्य जपण्यासाठी मालमत्ताकर, पाणीपट्टी, तसेच महानगरपालिकेशी संबंधित इतर गोष्टी नवी मुंबई महानगरपालिकेचे संकेतस्थळ www.nmmc.gov.in यावर अथवा महानगरपालिकेचे ‘nmmc e conect’ मोबाईलद्वारे ऑनलाईन पद्धतीने करावा. सामाजिक आरोग्य हिताच्या दृष्टीने नागरिकांनी प्रत्यक्ष संपर्क न साधता ऑनलाईन पद्धतीचा वापर करावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
‘मराठी विज्ञान परिषदे’च्या ठाणे विभाग अध्यक्षपदी डॉ. रवींद्र प्रभुदेसाई यांची निवड !
पन्हाळगड-पावनखिंड ते विशाळगड ऐतिहासिक पदभ्रमण २०२६ उत्साहात !
मुंबईतील आंदोलनातून फहाद अहमद कह्यात !
श्री महालक्ष्मीदेवी मंदिराच्या संरक्षणासाठी १५ दिवसांत अधिसूचना काढा !
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दुसरे गोल रिंगण भक्तीमय वातावरणात पार पडले !
गोव्यातील धरणांतील जलसाठ्यात लक्षणीय वाढ