शिक्षणावरील गुंतवणुकीच्या तुलनेत सामाजिक परतावा येत नाही ! – देवेंद्र फडणवीस

शिक्षणातून सामाजिक उपयोगता मिळण्यासाठी पाश्चात्त्य शिक्षणपद्धतीऐवजी भारतीय संस्कृतीवर आधारित शिक्षणप्रणाली आणणे आवश्यक आहे !

दिव्यांग शाळांमधील बनावट नोकरभरती आणि ना-हरकत प्रमाणपत्रे यांविषयी दोषी अधिकार्‍यांवर कारवाई करणार ! – शंभूराज देसाई, मंत्री

राज्यातील दिव्यांग शाळांमधील बनावट नोकरभरती आणि ना हरकत प्रमाणपत्र यांसाठी जे अधिकारी दोषी असतील त्यांची १ मासात चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.

मुंबई महानगरपालिका सफाई कामगारांच्या आरोग्यविषयक सुरक्षिततेसाठी उपाययोजना करणार ! – उदय सामंत, उद्योगमंत्री

मुंबई महानगरपालिका सफाई कामगारांच्या आरोग्यविषयक सुरक्षितेसाठी उपाययोजना करण्यात येणार असून सफाई कामगारांवर कोणताही अन्याय होणार नाही, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी २६ जुलै या दिवशी विधान परिषदेत दिली.

छत्रपती संभाजीनगर येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक लवकरच पूर्ण करणार ! – उदय सामंत, उद्योगमंत्री

छत्रपती संभाीनगर येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक लवकरच पूर्ण करण्यात येणार असून आवश्यक तो निधीही देण्यात येणार आहे, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी २६ जुलै या दिवशी विधान परिषदेत तारांकित प्रश्नाला उत्तर देतांना दिली.

कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापिठातील विद्यार्थ्यांना जुने पेपर दिल्याच्या प्रकरणी चौकशीसाठी समिती गठीत ! – चंद्रकांत पाटील, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री  

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठाच्या अंतर्गत चालू व्यवस्थापनशास्त्र विभागाच्या परीक्षेत सलग सातव्या पेपरला विद्यार्थ्यांना जुनीच प्रश्नपत्रिका देण्यात आल्याच्या घटनेची चौकशी करण्यासाठी समिती गठीत केली जाईल.

जानेवारी ते मे या कालावधीत महाराष्ट्रातील १९ सहस्र ५३३ महिला बेपत्ता ! – अनिल देशमुख, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस

अनेक गोष्टींत प्रथम क्रमांक पटकावणारे आणि पुरोगामी म्हणण्यात येणारे  महाराष्ट्र राज्य महिलांसाठी मात्र असुरक्षित असणे, हे दुर्दैव !

राज्यात केळी संशोधन केंद्राची स्थापना होणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्यात केळी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. यासह केळी संशोधन केंद्रही स्थापन करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २५ जुलै या दिवशी विधानसभेत दिली.

बुलढाणा येथे बस दरीत कोसळलली, प्रवासी सुखरूप !

बुलढाण्यामधील राजूर घाटात एक बस दरीत कोसळली. यामध्ये ५५ प्रवासी होते. यामध्ये २ विद्यार्थी किरकोळ घायाळ झाले आहेत. त्यांच्यावर उपचार चालू आहेत.

मुलींच्या वसतीगृहांच्या ठिकाणी महिला सुरक्षारक्षक नियुक्ती करण्याला प्राध्यान्य देणार ! – शंभूराज देसाई, मंत्री

जेथे मुलींची वसतीगृहे आहेत, तेथे महिला प्रबंधक  नियुक्त करण्याचा आदेश सरकारकडून देण्यात आला आहे. वसतीगृहात सुरक्षारक्षकांची नियुक्ती बाहेरील एजन्सींकडून करण्यात येते.

यापुढे झोपडपट्टी पुनर्वसन योजनांसाठी समयमर्यादा निश्चित करण्यात येईल ! – अतुल सावे, गृहनिर्माणमंत्री

यापुढे राज्यात झोपडपट्टी पुनर्वसन योजनांसाठी समयमर्यादा निश्चित करण्यात येईल. त्याविषयीचे विधेयक सभागृहात आणले जाईल. जे प्रकल्प वेळेत पूर्ण करणार नाहीत, त्या विकासकांना पालटण्याची तरतूद करण्यात येईल, असे गृहनिर्माणमंत्री अतुल सावे यांनी विधानसभेत सांगितले.