सुनेचे पाय धरल्यामुळे पुण्य सासूला मिळणे; पण सुनेची अधोगती होणे

‘पोरी, सुनेचे पाय धरलेस, तर काही वाईट वाटण्याचे कारण नाही. योग्य केलेस. पाय धरलेस ते तुझ्यात चांगुलपणा असल्याने. ते परमेश्‍वराचे पाय धरल्यासारखे झाले. पाय तिचे; पण पुण्य तुझ्याकडे आले आणि तिला आणखी अधोगती आली.’ – प.पू. आबा उपाध्ये

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ‘साधकांनो, तुम्ही जिंकलात, मी हरलो’ या काव्यातील पंक्तींविषयी साधकाने व्यक्त केलेले भावपूर्ण विचार

प.पू. डॉक्टर, आमच्याही मनात असंख्य वेळा हा विचार येतो; पण तुम्हाला सोडवत नाही. हे त्रासही आनंदाने भोगण्याची क्षमता आणि प्रेरणा तुम्हीच आमच्यात निर्माण करता.

‘अपेक्षा करणे’ हा अहंचा पैलू घालवण्यासाठी साधिकेने केलेले चिंतन आणि तो न्यून करण्यासाठी केलेले प्रयत्न !

जेव्हा मला स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेविषयी समजले, तेव्हा ‘मला इतरांकडून पुष्कळ अपेक्षा असतात’, हे माझ्या लक्षात आले आणि मी प्रयत्न करण्यास आरंभ केला.

‘आध्यात्मिक ऊर्जा टिकवण्यासाठी नामजप करायला पाहिजे’, असे सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सांगणे अन् त्याप्रमाणे केल्यावर ‘आध्यात्मिक ऊर्जा मिळत आहे’, असे वाटून पुढील सेवा चांगली करता येणे

‘सद्गुरु (सौ.) बिंदाताईंनी (सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी) एका साधिकेला विचारले, ‘‘तू थकलीस का ?’’ तेव्हा तिने ‘नाही’ असे उत्तर दिले. त्यावर सद्गुरु ताई म्हणाल्या, ‘‘आपण कधीच थकत नसतो. आपल्यात असलेली आध्यात्मिक ऊर्जा संपते; म्हणून आपण थकतो.