निगडी (पुणे) येथून ५ बांगलादेशी घुसखोरांना अटक !

अशी थोड्या थोड्या बांगलादेशींनी अटक करण्याऐवजी त्यांच्याविरुद्ध मोहीम राबवूनच हा प्रश्न सोडवायला हवा !

धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ यांच्या कृतीशील सहभागामुळे पुणे येथील ‘श्रीराम नामसंकीर्तन’ अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद !

श्रीरामाचा जप, श्रीरामाकडे रामराज्यासाठी प्रार्थना आदींमुळे अवघे वातावरण राममय !, सनातन-निर्मित श्रीरामाचे चित्र आणि रामरक्षास्तोत्र लघुग्रंथाचे वितरण !

रामराज्यासाठी प्रार्थनेसह पुणे येथील विविध मंदिरांची स्वच्छता करण्यात धर्मप्रेमींचा पुढाकार !

भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनीही अयोध्येतील श्रीराममंदिरात मूर्तीप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर मंदिरांची स्वच्छता करण्याचे आवाहन केले होते. या अंतर्गत हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पुणे जिल्ह्यातही हे अभियान राबवण्यात आले.

नाट्यगृहाचे काम येत्या दीड वर्षात पूर्ण करणार असल्याची पुणे महापालिका आयुक्तांची ग्वाही !

सिंहगड रस्ता परिसरातील वडगाव बुद्रुक येथे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह आणि कला मंदिराचे काम चालू आहे.

नथुराम गोडसे स्मृतीस्थळ विकसित करण्यासाठी १०० कोटींचा निधी द्यावा ! – अजय सिंह सेंगर, महाराष्ट्र करणी सेना

हिंदु राष्ट्र निर्माण करणे हे नथुराम गोडसे यांचे स्वप्न होते; म्हणून मोदी सरकार यांना हे राष्ट्र हिंदु राष्ट्र म्हणून घोषित करायचे असेल, तर नथुराम गोडसे, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे उदात्तीकरण करणे देशहित आणि हिंदु धर्म हितासाठी आवश्यक आहे.

मद्यार्कपासून हवाई इंधन बनवणार्‍या पहिल्या पथदर्शी तंत्रज्ञान प्रकल्पाचे केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्या हस्ते पुणे येथे उद्घाटन !

या प्रकल्पातून शाश्वत जैविक हवाई इंधन अर्थात् ‘एस्.ए.एफ्.’ची निर्मिती होणार आहे. पुण्याजवळील पिरंगुट औद्योगिक वसाहतीमधील प्राज उद्योग समुहाच्या संशोधन आणि विकास विभागात हा पथदर्शी प्रकल्प उभारण्यात आला आहे.

फेब्रुवारी संपण्यापूर्वी कामाच्या निविदा काढण्याचे पुणे आयुक्तांचे आदेश !

मार्च मासात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार असल्याने महापालिकेची कामे मार्गी लागावीत, यासाठी आयुक्त विक्रमकुमार यांनी कामांचा आढावा घेतला.

श्रीरामललांच्या २१ फुटी प्रतिमेच्या अनावरणानंतर विविध कार्यक्रम !

या प्रतिमेचे अनावरण रास्ते श्रीराम मंदिराचे प्रमुख विश्वस्त सरदार कुमारराजे रास्ते यांनी केले. मंदिरात ५ दिवस रामरक्षास्तोत्र पठण, तसेच विविध कार्यक्रम झाले. प्रतिष्ठापनेच्या दिवशी श्री दत्त याग झाला.

संघर्षाचा सामना करून त्यावर विजय मिळवण्याची प्रेरणा वनवासात गेलेले श्रीराम देतात ! – डॉ. कुमार विश्वास, प्रसिद्ध रामकथाकार

डॉ. कुमार विश्वास पुढे म्हणाले की, कठीण प्रसंगातून मार्ग कसा काढावा, याची शिकवण रामायण देते. जेव्हा जग प्रतिकूलतेशी संघर्ष करत असेल, निराशेच्या वातावरणात जगात असेल, तेव्हा सूर्यवंशी भगवान श्रीराम मार्ग दाखवत रहातात.

आळंदी (जिल्हा पुणे) येथे इंद्रायणी जलप्रदूषण मुक्तीसाठीचे बेमुदत उपोषण चालू !

नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी नागरिकांना उपोषण करायला लावणारे प्रशासन ! प्रशासन संवेदनशील आणि कार्यक्षम कधी होणार ?