प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांचे विचारधन !
भगवद्पाद शंकराचार्यांचा ‘वैलक्षण’ हा एकच शब्द मुक्ती द्यायला समर्थ आहे. अंतःकरणापासून आत्मा वेगळा आणि विलक्षण आहे. स्थूल, सूक्ष्म आणि कारण देहापासून आत्मा विलक्षण अन् वेगळा आहे, हे उमगले.
भगवद्पाद शंकराचार्यांचा ‘वैलक्षण’ हा एकच शब्द मुक्ती द्यायला समर्थ आहे. अंतःकरणापासून आत्मा वेगळा आणि विलक्षण आहे. स्थूल, सूक्ष्म आणि कारण देहापासून आत्मा विलक्षण अन् वेगळा आहे, हे उमगले.
‘सूर्योदयाआधी अभ्यंगस्नान करा. बांबूच्या काठीस रेशमी खण बांधून घरावर अथवा दारात पाटावर गुढी उभी करा. पूजा करा. सूर्यास्ताला गुळाचा नैवेद्य दाखवून गुढीचे विसर्जन करा.
बटू ब्राह्मण म्हणून माझ्या बरोबरीची मुले मला नमस्कार करायची. मोकळेपणाने भांडाभांड करून खेळायचीही ! मोठ्या काकांकडे भांडणाच्या तक्रारीपण जायच्या.
ज्ञान होण्याआधी व्यवहार खोटा म्हणणे धाडसाचे आहे. शास्त्र, नीती, देशभक्ती यांचा त्याग करणे, हा महाअपराध आहे; पण परमात्मज्ञानाच्या नंतर व्यवहाराला कवटाळणे वेडेपणाचे होईल. – गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी
ध्रुव अरण्यात जातो. त्याला काहीच ठाऊक नसते. त्याच्या आईने त्याला सांगितलेले असते, ‘देव अरण्यात असतो.’ वाघ दिसल्यावर ध्रुव त्याला विचारतो, ‘अरे बाबा, तू देव पाहिलास का ?’ वाघ खाईल म्हणून वाघाचे त्याला भय वाटत नाही…..
जीवन म्हणजे पाण्यावर ओढलेली रेघ आहे. ‘ती तर मिटवायचीच !’, असे पक्के जाणूनच आपल्याला जीवन जगायचे आहे. एकदा हे मनात रूजले की, मान-अपमान, सुख-दु:ख यांपलीकडे जाऊन धैर्याने त्या भगवंताच्या वाटेने आपल्याला जायचे आहे, हे समजते.
पाखंडच धर्माचे सोंग घेऊन सजले आहेत. त्याहूनही आश्चर्य असे की, पाखंडाच्या त्या सोंगामध्ये सगळ्यांना आकर्षून घेण्याची अदभुत शक्ती आहे.
भगवंताच्या प्राप्तीचा मार्ग कंटकाकीर्ण (काट्याकुट्यांनी भरलेला अत्यंत कष्टप्रद) आहे. एकट्यानेच ही वाटचाल करायची आहे. त्यात नाना संकटे, नाना अडथळे आहेत. हे टाळण्याकरता स्वधर्मानुसार कर्म आचरले पाहिजे.
आद्यशंकराचार्यांकडे एक अनोळखी माणूस ब्रह्मज्ञानाविषयी काही शंका विचारायला आला. आचार्यांनी त्याच्या शंकेचे योग्य समाधान केले. तो दुसर्या दिवशी परत आला.
तीव्र मुमुक्षू, व्याकुळता आणि तगमगता ही शिष्याची पात्रता प्रकट करते. गुरूंकडे जायची योग्यता आणि अधिकार ती व्याकुळता बहाल करते. अशा श्रेष्ठ अधिकार्याला परमगुरु भगवंतच उपदेश करतात.