धार्मिक कृतींचे ज्ञान आणि आत्मज्ञानातील अंतर
धार्मिक कृतींचे ज्ञान झाले तरी त्यांचे कार्य शेष असते, तर आत्मज्ञानाचा एकदा बोध झाला की अज्ञान मिटून ज्ञानाचे कार्य संपते. अज्ञान नाहीसे होणे, हे आत्मज्ञानाचे फळ आहे. पुन्हा पुन्हा काही करावे लागत नाही.