१५ एप्रिलला रत्नागिरीत ‘सकल हिंदु समाजा’च्या वतीने ‘हिंदू गर्जना मोर्चा’

हिंदु धर्म आणि हिंदु धर्मीय यांच्यावर लव्ह जिहाद, धर्मांतर, गोहत्या, देवतांचे विडंबन आदी आघात सातत्याने होत आहेत. यांविषयी हिंदूंमध्ये जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने १५ एप्रिल दिवशी हिंदू गर्जना मोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे.

राज्यभरातील नायब तहसीलदार आणि तहसीलदार यांचे बेमुदत कामबंद आंदोलन !

राज्यभरातील २ सहस्र २०० नायब तहसीलदार आणि ६०० तहसीलदार यांनी ३ एप्रिलपासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे.

(म्हणे) ‘संयोगिताराजे छत्रपती खरे बोलत असून महंत खोटे बोलत आहेत !’ -‘स्वराज संघटने’चे मुख्य प्रवक्ते करण गायकर यांचे विधान

नाशिक येथील काळाराम मंदिरातील पुजार्‍यांकडून छत्रपती घराण्याचा अवमान झाल्याचे प्रकरण नाशिक – छत्रपती संभाजीराजे यांच्या पत्नी संयोगिताराजे यांनी केलेली पोस्ट ही अपप्रवृत्तींच्या विरोधात आहे. त्यात कोणतीही चूक नाही. संयोगिताराजे छत्रपती यांचे बोलणे खरे आहे; पण महंत खोटे बोलत आहेत. महंतांना अवाजवी वक्तव्ये करून प्रकाशझोतात रहाण्याची सवय आहे’, असे वक्तव्य ‘स्वराज संघटने’चे मुख्य प्रवक्ते करण गायकर … Read more

संभाजीनगर येथे विहिरीसाठी अधिकार्‍याने लाच मागितल्याने सरपंचाने पैसे उधळत केले आंदोलन !

शेतकर्‍यांच्या विहिरी संमत करून घेण्यासाठी जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगावचे सरपंच मंगेश साबळे यांनी फुलंब्री पंचायत समितीसमोर ३१ मार्च या दिवशी पैसे उधळत अनोखे आंदोलन केले.

सिंधुदुर्ग : नरडवे धरण प्रकल्पाचे काम पोलीस बंदोबस्तात चालू केल्याने संतप्त प्रकल्पग्रस्तांचा तीव्र विरोध

शेकडो ग्रामस्थांनी ठेकेदार आस्थापनाच्या कार्यालयाच्या बाहेर ठिय्या आंदोलन केले. ‘प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या प्रथम पूर्ण करा आणि त्यानंतरच कामाला प्रारंभ करा’, अशी मागणी ग्रामस्थांनी लावून धरली.

प्रा. वेलिंगकर यांच्या मातृभाषा आंदोलनावरील ‘लोटांगण’ पुस्तकाचे उद्या प्रकाशन

हितचिंतकानी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून गोव्यातील एका ज्वलंत चळवळीवर प्रकाशझोत टाकणार्‍या ‘लोटांगण’च्या विमोचन कार्यक्रमास प्रतिसाद द्यावा, असे आवाहन प्रकाशक श्रीविद्या प्रतिष्ठान आणि लेखक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी केले आहे.

कराची (पाकिस्तान) येथील सिंध विधानभवनाबाहेर हिंदूंचे सर्वांत मोठे आंदोलन !

पाकिस्तानसारख्या कट्टर इस्लामी देशात तेथील हिंदूंनी अशा प्रकारे संघटित होऊन आंदोलन करणे, हे कौतुकास्पद होय !

पिंपरी-चिंचवडमध्ये (पुणे) ‘आम्ही सारे सावरकर’ फ्लेक्सची चर्चा !

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडून स्वा. सावरकरांचा अपमान केल्याचा आरोप करत त्याच्या निषेधार्थ आणि स्वा. सावरकर यांच्या सन्मानार्थ भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्या वतीने ‘आम्ही सारे सावरकर’ ही मोहीम चालू करण्यात आली आहे.

कांदा उत्पादक शेतकर्‍यांचे पुणे-नाशिक महामार्गावर ‘रस्ता बंद’ आंदोलन

कांद्याला ५ ते ८ रुपये प्रतिकिलो बाजारभाव मिळाल्याने शेतकर्‍यांमध्ये संताप होता. या वेळी १५ रुपये प्रतिकिलो प्रमाणे कांद्याचा पुन्हा लिलाव करावा, तसेच तहसीलदारांनी आंदोलकांना शब्द देण्यासाठी यावे, अशी मागणी करण्यात आली.

‘म्हादई’ व्याघ्र संरक्षण क्षेत्र अधिसूचित करा ! – प्रा. राजेंद्र केरकर, पर्यावरणतज्ञ

‘‘म्हादई अभयारण्य परिसरात ज्या ठिकाणी मनुष्यवस्ती आहे, तो भाग वगळून अन्य परिसर हा व्याघ्र संरक्षण क्षेत्र म्हणून अधिसूचित केला जाऊ शकतो. राजकारणासाठी म्हादईचा बळी देऊ नये, अन्यथा त्याचे संपूर्ण गोव्याला परिणाम भोगावे लागतील.’’