तीव्र आध्यात्मिक त्रास होत असतांना सद्गुरु आणि संत यांनी स्वप्नात येऊन आश्वस्त करून चैतन्य दिल्यामुळे त्रास न्यून होणे
त्या पहाटे माझ्या स्वप्नात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, सद्गुरु राजेंद्रदादा आणि पू. (सौ.) अश्विनी पवार हे चौघे आले. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी माझे डोके त्यांच्या मांडीवर घेतले आणि माझ्या गालावरून आईच्या मायेने हात फिरवला.