गोपीभाव !

‘गोपी’ श्रीकृष्णरूपी चैतन्याची एक तरल धारा आहे. ती श्रीकृष्णतत्त्वाची निखळ, निर्झर पारदर्शकता आहे. गोपीभाव म्हणजे श्रीकृष्णभेटीची तळमळ किंवा श्रीकृष्णभेटीतील आर्तता !

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेली अमृतवचने !

सद्गुरु काकू प्रत्येक व्यक्तीमधील भगवंताला अनुभवायला सांगतात. त्या म्हणतात, ‘‘एखादी कृती करतांना जर भाव नसेल, तर तीच कृती परत भाव ठेवून करायची.

विविध दैनंदिन कृती करतांना ठेवलेला भाव !

‘तोंडाला पावडर लावतांना ती पावडर नसून व्रजभूमीतील (वृंदावनातील) श्रीकृष्ण, राधा आणि गोपी यांच्या चरणस्पर्शाने पावन झालेली माती आहे’, या भावाने पावडर लावली जाते अन् मनामध्ये श्रीकृष्णाविषयीचा भाव जागृत होतो….

भाववृद्धीसाठी करावयाच्या प्रार्थना

१. ‘देवा, तुझे माझ्यावर किती प्रेम आहे ?’, हे समजू दे.
२. भगवंता, मला दिवसभरात १०० प्रार्थना करण्याची आठवण कर.

‘भार्या म्हणे सुदाम्यासी’ हे भजन ऐकतांना साधकाने अनुभवलेली सुदाम्याची अवस्था!       

२९.५.२०१२ या दिवशी सकाळी ५ वाजता मी भावजागृतीसाठी प्रयत्न करत होतो.

साधिकेला दाढदुखीमुळे वेदना होत असतांना आपत्काळाची पूर्वसिद्धता म्हणून देवाने तिच्याकडून करवून घेतलेला एक छोटासा प्रयोग !

देवाने मला ‘आपत्काळात वेदनाशामक गोळ्या मिळणार नाहीत. आता तू मंद स्वरूपातील वेदना सहन करू शकत नाहीस, तर आपत्काळात तीव्र स्वरूपातील वेदना काय सहन करणार ? आणि आपत्काळात तुला अशा वेदना होत असतांना तू साधना तरी कशी करणार ?’, असे विचारले.

भावामृत विशेषांकाच्या निमित्ताने प्रार्थना !

हे ब्रह्मांडनायक, नारायणस्वरूप गुरुमाऊली, आम्ही तुला संपूर्णपणे शरण आलो आहोत. आम्हा पामर जिवांना तुझ्या अथांग प्रीतीच्या छत्रछायेखाली आश्रय देऊन तू कृतकृत्य केले आहेस !

हाताने खरकटे काढण्याची सेवा करतांना किळस वाटणे आणि श्रीकृष्णाने स्वतः यज्ञामध्ये उष्ट्या पत्रावळ्या उचलल्याचा प्रसंग आठवून सेवा परिपूर्ण करता येणे

८.९.२०२० या दिवशी मी खरकटे आणि ओला कचरा बालदीतून काढण्याची सेवा करत होते.