‘८.९.२०२० या दिवशी मी खरकटे आणि ओला कचरा बालदीतून काढण्याची सेवा करत होते. त्या वेळी मी छोट्या बालदीतील खरकटे मोठ्या बालदीत उलटे करून टाकले; पण छोट्या बालदीला आतून खरकटे चिकटलेले होते. ते हाताने काढण्यास मला किळस वाटत होती. ‘तेव्हा माझे काहीतरी चुकत आहे’, याची मला जाणीव झाली. ‘राजसूय यज्ञाच्या वेळी भगवान श्रीकृष्णाने स्वतः उष्ट्या पत्रावळी उचलल्या होत्या. त्या भगवंताशी मला एकरूप व्हायचे आहे’, असे विचार परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने माझ्या मनात आले आणि सेवा परिपूर्ण करण्याची जाणीव झाली. तेव्हा मी छोट्या बालदीला लागलेले खरकटे कोणताही किंतु मनात न आणता हाताने काढले आणि ‘बालदीला अजून काही अन्नकण चिकटले आहेत का ?’, हे बघून बालदी स्वच्छ धुतली.
‘परात्पर गुरुमाऊली, माझ्या स्थूल आणि सूक्ष्म देहात आपले अस्तित्व आहे. आपल्या अस्तित्वामुळेच माझ्या मनात सकारात्मक अन् योग्य विचार येऊन आपणच माझ्याकडून योग्य कृती करवून घेता’, त्यासाठी मी आपल्या चरणी कृतज्ञ आहे. ‘गुरुमाऊली, आपल्याला अपेक्षित अशी साधना माझ्याकडून प्रत्येक क्षणी होऊ देत’, अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे.’ – कु. सुप्रिया जठार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.९.२०२०)
साधकांना आधार देणारे आणि उत्तम नेतृत्वगुण असलेले ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्री. नागेश गाडे (वय ५० वर्षे) !
कर्करोगाच्या व्याधीला सामोरे जातांना साधिका सौ. लता ढवळीकर यांनी अनुभवलेला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेचा वर्षाव !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांसाठी व्यष्टी आणि समष्टी स्तरांवर केलेल्या उपायांमागील शास्त्र
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
साधकांनो, जिज्ञासू ‘आपले’ झाल्यावर नव्हे, तर ‘आपले’ होण्यासाठी त्यांना तत्परतेने वाचक बनवा !
अर्थाचा अर्थ, भावार्थ, साधना आणि गुरुकृपा यांचे महत्त्व !