राष्ट्रीय जीवनासाठी शक्तीसंचयाची खाण असलेली उपनिषदेच शक्तीस्थाने बनू शकतात ! – स्वामी विवेकानंद
आपल्याला केवळ शक्तीचीच आवश्यकता असून प्रत्येक क्षणी ‘शक्ती’, ‘शक्ती’, असाच ध्यास हवा ! उपनिषदे म्हणजे प्रचंड शक्तीसंचय असलेली मोठी खाण आहे. ही उपनिषदेच हाती तुतारी घेऊन सार्या दुर्बल जनांना, दुःखी, कष्टी आणि विविध स्तरांवरील लोकांना सांगतील की, तुम्ही तुमच्या पायावर उभे रहायला शिका आणि मुक्त व्हा !