सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितल्यानुसार नामजप आणि वास्तूशुद्धी केल्यावर शारीरिक अन् मानसिक त्रास न्यून होणे

‘आम्ही डोंबिवलीहून गोवा येथे स्थलांतरित झाल्यानंतर माझे यजमान (श्री. विजय लोटलीकर, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) यांना अस्थम्याचा (दम्याचा) त्रास चालू झाला. त्यांना १५ दिवस जेवणही जात नव्हते. मलाही गोवा येथे आल्यावर ‘चिडचिड होणे, राग येणे, प्रतिक्रिया येणे’, असे त्रास होत असल्याने ‘काहीच करायला नको’, असे वाटत असे.

सौ. संगीता लोटलीकर

१. परात्पर गुरुदेवांनी सांगितल्यानुसार आश्रमातील महाप्रसाद ग्रहण केल्यावर यजमानांच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागणे

परात्पर गुरुदेवांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) माझ्या मुलीला (कु. प्रियांकाला (आताच्या सौ. प्रियांका गाडगीळ) आश्रमातील महाप्रसादाचा डबा श्री. विजय यांना पाठवण्यास सांगितले. त्यांनी श्री. विजय यांच्यासाठी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना नामजप विचारायला सांगितला. त्या दिवशी यजमानांना पाऊण मासाच्या कालावधीनंतर जेवण गेले. तेव्हापासून यजमानांच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागली.

२. सद्गुरु गाडगीळकाकांनी आम्हाला नामजप आणि वास्तूशुद्धी करायला सांगितली. आम्ही ८ दिवस प्रतिदिन ४ – ५ वेळा वास्तूशुद्धी केल्यावर आमचा त्रास न्यून होऊ लागला. तेव्हा माझी परात्पर गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.

३. त्या वेळी मला वाटले, ‘आपल्याला बाह्यतः वास्तू चांगली आहे’, असे वाटत असले, तरीही त्या वास्तूत त्रास असू शकतात.’

– सौ. संगीता लोटलीकर (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), फोंडा, गोवा.

  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.