पाकिस्तानमधील कोरोनाग्रस्त रुग्णांना पाकव्याप्त काश्मीरमध्ये करत आहे स्थलांतरित

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील कोरोनाग्रस्त ‘पॉझिटिव्ह’ रुग्णांना पाकच्या सैन्याकडून पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट-बल्टिस्तान या भागात स्थलांतरित करण्यात येत आहे. कोरोनाचा संसर्ग होण्याच्या भीतीमुळे स्थानिक नागरिकांकडून जोरदार विरोध करण्यात येत आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सी.आर्.पी.एफ्.च्या सैनिकांनी दिले एक दिवसाचे वेतन !

कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी साहाय्य म्हणून प्रत्येक जण पुढे येऊ लागले आहेत. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (‘सी.आर्.पी.एफ्.’च्या) सैनिकांनीही स्वेच्छेने त्यांचे एक दिवसाचे वेतन दिले आहे.

दळणवळण बंदीचे उल्लंघन केल्यास २ वर्षांच्या कारावासाची शिक्षा

कोरोनाला रोखण्यासाठी देशभरात ‘दळणवळण बंदी’ लागू करण्यात आली आहे. या बंदीचे संपूर्ण देशभर समान पद्धतीने पालन व्हावे, यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरणाने नियमावली जारी केली आहे. त्यानुसार दळवळण बंदीच्या निर्बंधांचे पालन न करणार्‍यांवर प्रशासन भा.दं.वि. कलम १८८ नुसार कारवाई करू शकते.

वुहानमध्ये कोरोनामुक्त झालेल्या १० टक्के नागरिकांना पुन्हा कोरोनाची लागण !

चीनने कोरोनावर नियंत्रण मिळवल्याचा दावा केला असतांनाच वुहानमध्ये कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांपैकी १० टक्के रुग्णांना पुन्हा त्याची लागण झाली आहे, असे शास्त्रज्ञ आणि डॉक्टर यांना आढळले आहे.

दूरदर्शनवर ‘रामायण’ मालिका २८ मार्चपासून पुन्हा प्रसारित करणार ! – केंद्र सरकार

दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांचे चित्रीकरण थांबल्याने त्यांचे प्रसारणही होत नाही, अशा वेळी ‘रामायण’ ही जुनी आणि अत्यंत गाजलेली मालिका दाखवण्याची मागणी लोकांकडून झाल्यामुळे केंद्र सरकारने ती दूरदर्शनवर पुन्हा प्रसारित करण्याचा निर्णय घेतला.

दळणवळण बंदी असतांनाही तेलंगण येथे चारचाकीतून फिरणार्‍या तरुणाला अटक

येथील पोलिसांनी दळणवळण बंदी असतांनाही चारचाकी वाहनातून फिरणार्‍या एका २० वर्षीय तरुणाला अटक करून त्याला विलगीकरण केंद्रात पाठवले आहे. ‘हा तरुण खोकत असल्याचे आढळून आल्याने त्याला या केंद्रात पाठवण्यात आले आहे’, असे पोलिसांनी सांगितले.

रत्नागिरीत दुचाकी वाहनावरून फिरण्यास बंदी ! – जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा

दळणवळण बंदीमुळे रत्नागिरीत पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अशाही परिस्थितीत काही लोक विनाकारण घराच्या बाहेर पडत आहेत. याला आळा घलण्यासाठी रत्नागिरीत दुचाकी वाहनावरून फिरण्यास बंदी घालण्यात आली आहे

झारखंड आणि तमिळनाडू येथील मशिदींमध्ये विदेशी मौलवी सापडले !

भारतातील बर्‍याच मशिदींमध्ये देशविघातक कारवाया चालतात, असा गुप्तचर विभागाचा अहवाल आहे. त्याच वेळी अशांवर कारवाई केली असती, तर ही वेळ आली नसती. अशा मशिदी आणि मौलवी यांच्यावर कारवाई करण्यासाठी सरकारने कृती करावी, अशी राष्ट्रप्रेमींची अपेक्षा !

देहलीतील ‘मोहल्ला क्लिनिक’चा डॉक्टर, त्याची पत्नी आणि मुलगी यांना कोरोनाची लागण

येथील मौजपूरमधील ‘मोहल्ला क्लिनिक’च्या (देहली सरकारकडून चालवण्यात येणारे लहान चिकित्सालय) एका डॉक्टरला कोरोनाची बाधा झाल्याचे तपासणीअंती निष्पन्न झाले आहे. यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्या ८०० जणांना विलगीकरण (क्वारंटाईन) करण्यात आले आहे.

बिहार सरकार प्रत्येक कुटुंबाला १ सहस्र रुपयांचे अर्थसाहाय्य करणार

कोरोनामुळे संपूर्ण देशात दळणवळण बंदी करण्यात आल्याने मजुरी करणार्‍यांचा आणि काम गमावलेल्या लोकांच्या कुटुंबांना बिहार सरकार प्रत्येकी १ सहस्र रुपयांचे अर्थसाहाय्य करणार आहे.