
नवी देहली – कोरोनाला रोखण्यासाठी देशभरात ‘दळणवळण बंदी’ लागू करण्यात आली आहे. या बंदीचे संपूर्ण देशभर समान पद्धतीने पालन व्हावे, यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरणाने नियमावली जारी केली आहे. त्यानुसार दळणवळण बंदीच्या निर्बंधांचे पालन न करणार्यांवर प्रशासन भा.दं.वि. कलम १८८ नुसार कारवाई करू शकते. यानुसार ६ मासांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते; पण प्राप्त परिस्थितीत याहून कडक शिक्षेची आवश्यकता लक्षात घेऊन शासना००ने त्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या ५१ ते ६० या कलमांचाही वापर करण्याचा आदेश दिला आहे. यानुसार दळणवळण बंदीच्या निर्णयाचे उल्लंघन करणार्याला आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये २ वर्षांच्या कारावासाची शिक्षा करण्यात येणार आहे. या नियमावलीचे कसोशीने आणि कठोरपणे पालन करण्याचा आदेश केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्ये अन् केंद्रशासित प्रदेश यांना दिला आहे.
बेंगळुरू (कर्नाटक) येथे पोलीस निरीक्षकाने गुंडांसमवेत मिळून तरुणांकडून लुटले २० लाख रुपये !
Telegram App Ban : ‘टेलिग्राम’ ॲपवरील तात्पुरती बंदी कायम ! – देहली उच्च न्यायालय
Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाने राजकीय पक्षांतरांच्या घटनांमध्ये हस्तक्षेप करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली
विशेष अन्वेषण पथक सत्य-असत्याचा उलगडा करेल ! – Yogi Adityanath
Filmmaker Imtiaz Ali : चित्रपट निर्माते इम्तियाज अली यांची ‘राधा-कृष्ण’ यांच्यावर चित्रपट बनवण्याची इच्छा !
भित्तीपत्रक लावणार्या महिला अधिकार्याचे स्थानांतर ! – नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त