कोरोनाच्या संकटाचे गांभीर्य ओळखा आणि सहकार्य करा ! – जनतेला वारंवार आवाहन करण्याची शासनावर वेळ

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासन विविध प्रकारे प्रयत्न करत आहे; मात्र काही ठिकाणी या प्रयत्नांना हरताळ फासला जात आहे. जनतेला अजूनही कोरोनाच्या दुष्परिणामांची जाणीव नसल्याचे चित्र दिसत असून राज्यासह जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली असतांनाही काही जण याचे उल्लंघन करत आहेत.

गोव्यात ‘जनता कर्फ्यू’ च्या काळात घडलेल्या काही वैशिष्ट्यपूर्ण घडामोडी

गोव्यात २४ मार्च या दिवशी मध्यरात्रीपर्यंत ‘जनता कर्र्फ्यू’ लागू होता आणि यानंतर २४ मार्चच्या मध्यरात्रीपासून ३१ मार्चपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. २४ मार्च या दिवशी ‘जनता कर्फ्यू’ च्या काळात राज्यात घडलेल्या काही वैशिष्ट्यपूर्ण घडामोडी पुढे देत आहे.

अमेरिकेत कोरोनामुळे २४ घंट्यांत ११७ जणांचा मृत्यू

अमेरिकेमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून मागील २४ घंट्यांमध्ये ११७ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात झाली आहे. त्यामुळे कोरोनामुळे मृत झालेल्या एकूण रुग्णांचा आकडा ४१९ झाला आहे.

गोव्यात ३१ मार्चपर्यंत संचारबंदी लागू

गोव्यात २४ मार्च या दिवशी मध्यरात्रीपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे आणि विनाकारण घराबाहेर पडणार्‍यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची चेतावणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी येथे ‘फेसबूक’च्या माध्यमातून लाईव्ह करण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत केली.

२५ ते ३१ मार्चपर्यंत मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती बंद ठेवण्याचा व्यापार्‍यांचा निर्णय

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जीवनावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद करण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला असला, तरी २५ ते ३१ मार्चपर्यंत मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय व्यापार्‍यांनी घेतला आहे.

देहली पोलिसांनी १०१ दिवसांनंतर शाहीन बागमधील तंबू हटवले !

येथील शाहीन बागमध्ये मागील १०१ दिवसांपासून नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (सीएएच्या) विरोधात धर्मांधांचे आंदोलन चालू होते. देहली पोलिसांनी २४ मार्च या दिवशी या आंदोलनस्थळी कारवाई केली……..

गुढीपाडव्याला ‘मी घरी थांबणार, मी कोरोनाला हरवणार’ हा संकल्प करा ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

कोरोनाचे रुग्ण वाढत असले, तरी दुसरीकडे रुग्णालयात भरती असलेले रुग्ण बरे होत आहेत, ही समाधानाची गोष्ट आहे. दोघांची प्रकृती गंभीर आहे.

जमावबंदीचा आदेश असतांनांही कल्याण येथे रस्त्यावर जमणार्‍या धर्मांधांवर गुन्हा नोंद

कायदा आणि पोलीस यांचा जराही धाक नसलेले धर्मांध नेहमीच समाजघातकी आणि देशविरोधी कृत्ये करतात !

कोरोनाच्या संकटाचा कुणीही संधी म्हणून उपयोग करू नका ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

मी पोलिसांचे अभिनंदन करतो की, त्यांनी लाखो रुपयांचा ‘मास्क’चा साठा पकडला आहे. आपण थोडा समजूतदारपणा दाखवला पाहिजे. आपण जगणे थांबवलेले नाही, तर अधिक जगण्यासाठी जगण्याच्या शैलीत काही पालट केला आहे.

भिवंडी येथील मशिदीच्या विश्‍वस्तांवर गुन्हे नोंद

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील सर्व धार्मिक स्थळे पुढील सूचना येईपर्यंत बंद करण्याचे आदेश लागू करण्यात आले आहेत.