‘वक्फ बोर्ड कायदा समजून घेतांना…’ या विषयावरील परिसंवाद

डोंबिवली – मागील अनेक वर्षे आपण हिंदू-मुसलमान ‘भाई-भाई’ असे म्हणण्याची घाई करायचो; परंतु प्रत्यक्षात हिंदू-मुसलमान हे कधीच ‘भाई-भाई’ होऊ शकत नाहीत. मुळात मुसलमान लोक विविध माध्यमातून भारत इस्लामिक राष्ट्र होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यासाठी लव्ह जिहाद, हलाल जिहाद यांसह लोकसंख्या वाढ, भूमी जिहाद आदी सर्वच प्रकार अवलंबत आहेत. हे लक्षशत घेऊन आपण सर्वांनी सरकार करत असलेल्या राष्ट्र आणि धर्म विषयक उपक्रमांच्या पाठीशी कायम उभे राहिले पाहिजे. ते आपले दायित्व आहे. येणार्या पिढीला घटना आणि कायदा यांचे ज्ञान होण्यासाठी कार्यशाळा घेऊन त्यांना निर्भय बनवले पाहिजे, असे वक्तव्य प्रसिद्ध लेखक आणि व्याख्याते श्री. दुर्गेश परुळकर यांनी डोंबिवली येथे केले. येथील सुप्रसिद्ध ‘पै फेन्डस् लायब्ररी’च्या वतीने ‘वक्फ बोर्ड कायदा समजून घेतांना…’ या विषयावर १८ एप्रिलला येथील आदित्य मंगल कार्यालय येथे परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर लेखक आणि प्रवचनकार डॉ. सच्चिदानंद शेवडे आणि हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. सतीश कोचरेकर उपस्थित होते.
श्री. दुर्गेश परुळकर म्हणाले,…
१. फाळणीनंतर भारत आणि पाकिस्तान वेगवेगळे झाले खरे; पण त्यानंतरही आतापर्यंत मुसलमानांच्या आक्रमकतेपुढे हिंदूंना त्यांच्या जागा, तसेच त्यांचा जीव वाचवण्यासाठी देशाच्या अन्य भागांत विस्थापित व्हावे लागले.
२. विभाजनाच्या वेळी मुसलमानांनी म्हटले होते, ‘हसके लिया पाकिस्तान, लडके लेंगे हिंदुस्थान ।’ आज तीच स्थिती आपल्याला दिसून येत आहे. आपण इतिहासातून काहीच शिकलो नाही, हेच खरे !
३. श्रीराम आणि श्रीकृष्ण हे कधी परिस्थिती पाहून पळून गेले नाहीत, उलट त्यावर मात करण्यासाठी रणनीती आखली आणि त्यानुसार शत्रूवर आक्रमण करून त्यांचा नायनाट केला; मात्र आम्ही केवळ रडत रहातो; पण लढत नाही. आपण सर्वांनी येणार्या परिस्थितीशी लढायला शिकायला हवे.
सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीतील सकारात्मक गोष्टी समोर आल्याच नाहीत ! – डॉ. सच्चिदानंद शेवडे, लेखक आणि प्रवचनकार

वक्फ सुधारणा कायद्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यात कुठल्याही प्रकारची स्थगिती देण्यात आलेली नाही. या सुनावण्यांविषयी जो तो आपापल्या परीने अर्थ काढून सोयीस्कररित्या मांडण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे त्याच गोष्टी आपल्यासमोर येतात. आपणही त्या खर्या मानून चालतो; मात्र त्या सुनावणीत काही सकारात्मक गोष्टीही झाल्या, ज्या आपल्यापर्यंत पोचल्याच नाहीत किंवा आपल्यासमोर येऊ दिल्या गेल्या नाहीत. १० वेळा एकच गोष्ट खोटी किंवा बुद्धीभेद करून सांगितली की, ती खरी वाटू लागते. जसे विभाजनानंतर येथील मुसलमान पाकिस्तानात गेले, तेथील हिंदू भारतात आले. त्या हिंदूंनी मुसलमानांच्या जागा घेण्यापूर्वी तत्कालीन सरकारने बोर्ड बनवून नियम केले; पण तिकडे पाकिस्तानात गेलेल्या मुसलमानांसाठी तेथील सरकारने कायदे किंवा बोर्ड केले नाहीत. विभाजनानंतरही काही मुसलमान पाकिस्तानात न जाता भारतातच राहिले. त्यांची काँग्रेसवाल्यांनी जाणीवपूर्वक भलावण केली. तिचे परिणाम आपण गेली अनेक वर्षे पहात आहोत.
वक्फ सुधारणा कायद्याच्या विरोधात दंगली घडवणे म्हणजे एकप्रकारे ‘लिटमस टेस्ट’ ! – सतीश कोचरेकर, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
(‘लिटमस टेस्ट’ मध्ये एकच घटक म्हणजे वृत्ती, घटना किंवा वस्तूस्थिती निर्णायक असते.)

वक्फ सुधारणा कायद्याच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर चुकीची माहिती पसरवली जात आहे. ज्यातून ठिकठिकाणी दंगली पसरवल्या जात आहेत. या दंगली म्हणजे एकप्रकारे ‘लिटमस टेस्ट’ (यात एकच घटक म्हणजे वृत्ती, घटना किंवा वस्तूस्थिती निर्णायक असते.) आहे. या माध्यमातून एका ठिकाणी दंगल घडवल्यावर तिचे परिणाम काय होतात, याची चाचणी केली जाते. यातूनच अतिरेकी, धर्मांध त्यांची रणनीती ठरवतात. बंगालमधील मुर्शिदाबादचे उदाहरण ताजे आहे. येथील हिंदु महिला हतबल होऊन धर्मांधांना ‘माझ्यावर बलात्कार करा; पण माझ्या पती-मुलांना सोडा’, अशी विनवणी करतांना दिसली होती. अशा घटना दिवसेंदिवस देशातील विविध भागांत वाढत आहेत. याला विरोध करण्यासाठी व्यापक प्रमाणावर हिंदूसंघटन आवश्यक आहे. वक्फ बोर्ड कायद्याची आवश्यकता का आहे, हेही यातून स्पष्ट होते. वक्फचा प्रारंभ, त्याचा इतिहास यांचा अभ्यास करून वर्तमानातील स्थिती सुधारण्यासह भविष्यातील परिणाम समजून घेतले पाहिजेत. हा इतर कायद्यांप्रमाणे सामान्य कायदा म्हणत दुर्लक्ष करू नका !
२७ एप्रिल या दिवशी डोंबिवली येथे पुस्तक महोत्सव !‘पै फ्रेन्डस् लायब्ररी’च्या वतीने नेहमीच राष्ट्र आणि धर्म जागृती, विशेषत: विद्यार्थी आणि तरुणांमध्ये वाचन संस्कृती वाढण्यासाठी गेली कित्येक वर्षे विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात. या उपक्रमांना सांस्कृतिकनगरी असलेल्या डोंबिवलीतून नेहमीच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. येत्या २७ एप्रिल या दिवशी डोंबिवली येथे पुस्तक महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. |