
बेळगाव – कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी २८ जानेवारीपूर्वी नवीन नियमाप्रमाणे व्यापारी आस्थापनांवरील फलकावर ६० टक्के जागेत कन्नड लिहायला हवे, अशी घोषणा केली आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीने या कन्नडसक्तीला विरोध करून जिल्हाधिकार्यांना या संदर्भात निवेदन दिले. कन्नडसक्ती करून सरकार मराठी भाषिकांवर अन्याय करत आहे. मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा आधार घेऊन कन्नड संघटनांचे कार्यकर्ते मराठी भाषेतील फलक हटवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे मराठी-कन्नड भाषिकांमधील सौहार्दपूर्ण वातावरण बिघडण्याची शक्यता आहे, असे त्या निवेदनात नमूद केले आहे.
या प्रसंगी ‘बेळगाव, कारवार, निपाणी, बीदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’, ‘बेळगाव आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’, अशी घोषणाबाजीही करण्यात आली.
हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या मागणीला शिक्षण खात्याचा सकारात्मक प्रतिसाद !
शाळांमध्ये अतिरेकी आणि राष्ट्रविरोधी विचारसरणीला थारा नसावा ! – नितीन फळदेसाई
मुंबईत ‘डबेवाले’ बांधवांच्या सन्मानार्थ वैद्यकीय पडताळणी आणि पाद्यपूजा !
भारतात अवैधरित्या वास्तव्यास असलेला अमेरिकेचा माजी सैनिक कह्यात
गोव्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील सुधारणांसाठी १८० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत
खड्डे तक्रारीचे ‘पी.एम्.सी. रोड मित्र’ अॅप ४ महिन्यांपासून बंद !