
पुणे – कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात चौकशी आयोगासमोर प्रकाश आंबेडकर यांची साक्ष नोंदवली गेली. या प्रकरणी निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती जे.एन्. पटेल आणि निवृत्त मुख्य सचिव सुमित मलिक असा द्विसदस्यीय आयोग स्थापन केला आहे. या आयोगाकडून मुंबई आणि पुणे येथे उलट पडताळणी करण्यात येत आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांनाही उपस्थित रहाण्याचे आदेश आयोगाने दिले होते, तर विश्वास नांगरे पाटील यांचीही आयोगासमोर उलट पडताळणी पूर्ण झाली. दंगल झाली, त्या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नगरमध्ये होते. त्यांना दंगलीसंदर्भात माहिती मिळाली नाही का ? आणि माहिती होती, तर मग ती त्यांनी दाबून का ठेवली ? असा प्रश्न प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या ‘शिवशक्ती दर्शन’ दौर्याच्या संदर्भातही त्यांनी भाष्य केले.
सांखळी येथील पुरातन किल्ल्याच्या नूतनीकरण प्रकल्पाचे लोकार्पण
मंगेशी येथे स्व. लता मंगेशकर आणि स्व. आशा भोसले यांचे स्मारक आणि संग्रहालय उभारणार ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे
दौंडमध्ये गुळात साखरेची भेसळ केलेला १७ लाखांचा साठा जप्त !
शेतकर्यास अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी साहाय्यक कृषी अधिकारी अमोल देवकर तात्काळ निलंबित !
राधानगरी परिसरात (जिल्हा कोल्हापूर) महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार : ४ जणांना अटक !
पुणे जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई !