पुणे येथील ‘प्रसाद प्रकाशन’चा अमृत महोत्सवी सांगता समारंभ

पुणे – सरस्वतीदेवी आहे कि नाही ? हा प्रश्न सध्या उपस्थित केला जातो; पण जग विश्वासावर चालते. मनुष्य हा एकमेव प्राणी असा आहे की, जो स्वतः विश्वास ठेवतो आणि दुसर्यांना विश्वास ठेवायला लावतो. श्रद्धा ठेवतोही आणि ती ठेवायलाही लावू शकतो. आपल्याला सगळे जीवन सुखमय हवे असते; पण सुख कशात आहे याविषयी दोन वेगळ्या विचारधारा आहेत. सगळ्या जगाची धारा एक आणि भारताची वेगळी आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी ८ जानेवारी या दिवशी व्यक्त केले. ‘प्रसाद प्रकाशन’च्या अमृत महोत्सवी सांगता समारंभात ते बोलत होते. सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार, मूर्तीशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. गो.बं. देगलूरकर, प्रसाद प्रकाशनच्या संपादिका डॉ. उमा बोडस या वेळी उपस्थित होत्या. या कार्यक्रमात प्रसाद प्रकाशनच्या संकेतस्थळाचे आणि ‘इंटरनेट रेडिओ’चे उद़्घाटन, तसेच १३ पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
(सौजन्य : ABP MAJHA)
भारतीय संस्कृती अखंडपणे चालत असलेली संस्कृती आहे. जगात भारताएवढी एकही प्राचीन संस्कृती नाही, असे मत डॉ. देगलूरकर यांनी या वेळी व्यक्त केले.
‘हलाल टॅक्स’ हा हिंदूंच्या खिशातून वसूल केला जाणारा ‘जिझिया कर’च ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
पुणे येथे पोलिसांचा गणवेश घालणार्या बनावट मुसलमान महिलेला अटक !
अखेर तुळजाभवानी देवीचा मुकुट सापडला; दोन जण जेरबंद
पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी ७३५.२५ हेक्टर क्षेत्राचे भूसंपादन पूर्ण !
परधर्मियांच्या आमिषांना फसलेल्या ६३३ बांधवांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कपड्यांच्या दुकानातील ‘ट्रायल रूम’मध्ये कपडे पालटणार्या महिलांचे गुपचूप व्हिडिओ काढणार्या शाहरूखला अटक