
मुंबई – गेल्या आठवड्यात कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तसेच पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा येथे अतीवृष्टीने हाहाकार माजवला होता. त्यामुळे अनेकांची घरे, दुकाने आणि शेती उद्ध्वस्त झाली आहे. गेल्या २ दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने पूरग्रस्त जिल्ह्यांतील जनजीवन पूर्वपदावर येत असतांनाच हवामान विभागाने पुढील ४ दिवसांत राज्यातील मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांमध्ये अतीवृष्टीची चेतावणी दिली आहे. मुंबई, ठाणे आणि कोल्हापूर जिल्ह्यांत ३० जुलै या दिवशी अतीवृष्टीची शक्यता आहे, तसेच रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत पुढील ४ दिवस, तर पुणे अन् सातारा जिल्ह्यांत पुढील ३ दिवस अतीवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
धर्मांतरितांना अनुसूचित जमातीच्या सवलती द्यायच्या का ?, हे निश्चित करण्यासाठी महाराष्ट्रात समिती स्थापन !
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात