अधिकार्यांकडून विनाकारवाई वाळू वाहतूक करण्यासाठी प्रतिमाह १ लाख रुपये हप्त्याची मागणी
अशा लाचखोरांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांना कठोर शिक्षा केल्यासच इतरांवर जरब बसेल !

धाराशिव – भूम येथील उपविभागीय अधिकारी मनीषा राशिनकर यांच्यासह एकाला येथील लाचलुचपत विभागाने २७ जुलै या दिवशी अटक केली. परंडा तालुक्यातील जेकटेवाडी येथील वाळू वाहतूक करणार्या विक्रेत्याकडे वाळूचा व्यवसाय चालू ठेवण्यासाठी पैशांची मागणी करण्यात आली होती. १ लाख १० सहस्र रुपयांची प्रतिमाह हप्तारूपी लाच स्वीकारतांना मनीषा राशिनकर आणि कोतवाल विलास जानकर यांना अटक करण्यात आली आहे. तक्रारदार यांचा एक टीप्पर, एक जेसीबी आणि तीन ट्रॅक्टर हे विनाकारवाई वाळू वाहतुकीसाठी चालू देण्यासाठी या अधिकार्यांनी लाच मागितली होती. (भ्रष्टाचाराने पोखरलेला महाराष्ट्र ! भ्रष्टाचारी अधिकार्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशीच सामान्य जनतेची मागणी आहे. – संपादक)
लाचखोर तहसीलदार विजय चव्हाण यांच्याकडे सापडले घबाड !
दादर येथे बेस्ट बसचा अपघात : दोघांचा मृत्यू, तर १३ जण घायाळ
तरुणांकडून रिक्शाचालकाला मारहाण !
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शाळांमधून होणारी विद्यार्थ्यांची लूट तात्काळ थांबवा !
‘NEET’ Re-Examination : ‘नीट’ पुनर्परीक्षेच्या प्रश्नपत्रिका सिद्ध करणारे तज्ञ २१ जूनपूर्यंत रहाणार अज्ञातवासात !
हिंदूंनो धर्माभिमान जागृत करून धर्मरक्षणासाठी सिद्ध व्हा ! – कु. क्रांती पेटकर, हिंदु जनजागृती समिती