अधिकार्यांकडून विनाकारवाई वाळू वाहतूक करण्यासाठी प्रतिमाह १ लाख रुपये हप्त्याची मागणी
अशा लाचखोरांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांना कठोर शिक्षा केल्यासच इतरांवर जरब बसेल !

धाराशिव – भूम येथील उपविभागीय अधिकारी मनीषा राशिनकर यांच्यासह एकाला येथील लाचलुचपत विभागाने २७ जुलै या दिवशी अटक केली. परंडा तालुक्यातील जेकटेवाडी येथील वाळू वाहतूक करणार्या विक्रेत्याकडे वाळूचा व्यवसाय चालू ठेवण्यासाठी पैशांची मागणी करण्यात आली होती. १ लाख १० सहस्र रुपयांची प्रतिमाह हप्तारूपी लाच स्वीकारतांना मनीषा राशिनकर आणि कोतवाल विलास जानकर यांना अटक करण्यात आली आहे. तक्रारदार यांचा एक टीप्पर, एक जेसीबी आणि तीन ट्रॅक्टर हे विनाकारवाई वाळू वाहतुकीसाठी चालू देण्यासाठी या अधिकार्यांनी लाच मागितली होती. (भ्रष्टाचाराने पोखरलेला महाराष्ट्र ! भ्रष्टाचारी अधिकार्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशीच सामान्य जनतेची मागणी आहे. – संपादक)
काँग्रेस नेत्यांनी कर्नाटकातील मंदिरांच्या १८ लाख रुपयांची केली लूट ! : भाजप
टाकळी (सांगली) येथे वाढीव वर्गणी देऊनही भेडसावणार्या तीव्र पाणीटंचाईमुळे नागरिक त्रस्त !
कुडाळ येथील शासकीय भूमीतील अनधिकृत ‘फास्ट फूड स्टॉल’ अखेर हटवला
पुणे शहरातील रस्त्यांवर केवळ ५४ खड्डेच !
उसप गावातील प्रस्तावित दगड खाण आणि क्रशर प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध
पत्नीचा छळ करून तिची आक्षेपार्ह छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी