१७ मेपर्यंत सांगली जिल्ह्यातील कडक दळणवळणबंदी वाढवणार ! – जयंत पाटील, पालकमंत्री

पालकमंत्री जयंत पाटील

सांगली – कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ५ ते १५ मे या कालावधीत सांगली जिल्ह्यात कडक दळणवळणबंदी पाळण्यात येत आहे. यामुळे जिल्ह्यात कोरोनाबाधित होण्याचा दर ३० टक्क्यांपर्यंत स्थिर झाला आहे. हाही अधिक असल्याने सर्व लोकप्रतिनिधींशी चर्चा करून कडक दळणवळणबंदी आणखी ३ दिवसांनी वाढवण्यात येत असून ती आता १७ मेपर्यंत असणार आहे. परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय १७ मे या दिवशी घेण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे.