लोकप्रतिनिधींनी असे वागणे दुर्दैवी !

सातारा, १० एप्रिल (वार्ता.) – ग्रामपंचायतीमध्ये माहिती अधिकाराचा अर्ज का दिला ? असे विचारत माण तालुक्यातील वळई गावचे सरपंच बबन काळेल, ग्रामपंचायत सदस्य सोपान काळेल आणि त्यांचे सहकारी यांनी गुरुदास काळेल यांना लाकडी काठी, दगड आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.
गुरुदास काळेल यांनी गावातील गायरान जमिनीवर असणार्या घरांचे ‘८ अ’चे उतारे मिळावेत, यासाठी ७ एप्रिल यादिवशी ग्रामसेवकाकडे माहिती अधिकारामध्ये अर्ज दिला होता. याविषयी माहिती मिळताच त्याच दिवशी सायंकाळी सरपंच बबन काळेल, सदस्य सोपान काळेल आणि इतरांनी माहिती अधिकारात अर्ज का दिला, असे म्हणत शिवीगाळ करत मारहाण करण्यास प्रारंभ केला. तसेच गुरुदास यांना जीवे मारण्याची धमकीही दिली. घायाळ झालेल्या गुरुदास यांनी सातारा येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेतले. गुरुदास काळेल यांच्या तक्रारीवरून सरपंच बबन काळेल, सदस्य सोपान काळेल आणि सहकारी यांच्याविरुद्ध म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ग्राहकाला ४० सहस्र रुपये हानीभरपाई द्या ! – ‘ग्राहक विवाद निवारण आयोगा’चा टपाल कार्यालयाला आदेश
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
शासनाची सर्व ओळखपत्रे भारतीय नागरिकत्वाचा पुरावा मानावा ! – प्रा. नागनाथ स्वामी, ‘जागृत ग्राहक राजा’ संस्था
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !
वारीतील दुर्घटनाग्रस्त वारकर्यांसाठी शासन राबवणार ‘विठ्ठल-रखुमाई वारकरी योजना’ !
तलाकच्या धमकीप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा नोंद !