अक्षय्य तृतीयेला सात्त्विकतेच्या प्रक्षेपणामुळे चांगले वाटण्याचे सरासरी प्रमाण ६० ते ७० टक्के इतके असते, तर पूर्वजांचा त्रास होण्याचे प्रमाण ३० ते ४० टक्के इतके असते. त्यामुळे अक्षय्य तृतीयेला देवता आणि पूर्वज यांना केलेल्या तीलतर्पणामुळे साधकावरील देवऋण आणि पितरऋणही काही प्रमाणात न्यून होण्यास साहाय्य होते. साधकाने प्रामाणिकपणे, मनापासून आणि भावपूर्णरीत्या तीलतर्पण केल्यास देवता आणि पूर्वज त्याच्यावर प्रसन्न होतात अन् त्याला साधना चांगली होण्यासाठी आणि व्यवहारातील अडचणी दूर होण्यासाठी आशीर्वाद देतात. – ईश्वर (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून, १०.५.२००५)
मंदिर विश्वस्त आणि व्यवस्थापन यांची आचारसंहिता !
मंदिरांवरील आघात रोखण्यासाठी मंदिरांचे संघटन होणे आवश्यक ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
जिवंतपणी ‘१० वा’ आणि पालटत्या सामाजिक प्रथा : एक शास्त्रीय दृष्टीकोन !
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठीच यज्ञसोहळा आणि समष्टी धर्मप्रसार !