
नाशिक – जीवनावश्यक वस्तूूच्या विक्रेत्यांनी त्यांची दुकाने चालू ठेवावीत. जीवनावश्यक वस्तूंची विक्री करतांना मालाची साठवणूक करणे, वस्तूंची भाववाढ अथवा विक्रीमध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा खपवून घेतला जाणार नाही. असे करणार्यांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी चेतावणी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली. जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीच्या संदर्भात तक्रारी आल्यानंतर संबंधित अधिकार्यांशी चर्चा करतांना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी हे स्पष्ट केले.
नागरिकांसाठी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा विनाअडथळा व्हावा, तसेच सर्वप्रकारचे दैनंदिन अत्यावश्यक व्यवहार सुरळीत रहावेत, यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने माहिती आणि साहाय्यासाठी ‘टीम संकट सोबती’ सिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये एकूण १७ अधिकारी कार्यरत आहेत. प्रत्येक अधिकार्याकडे वेगवेगळे विषय देण्यात आले असून संबंधित अधिकार्यांचे संपर्क क्रमांक जिल्ह्याच्या संकेतस्थळावर दिले आहेत. या परिस्थितीमध्ये ज्या नागरिकांना काही अडचणी येत असतील, त्यांनी संबंधित अधिकार्याला संपर्क केल्यास त्यांच्या अडचणी सोडवल्या जातील.
बनावट उत्पन्न दाखल्यांवर मिळालेले ‘आर्.टी.ई.’ प्रवेश रहित करा ! – माजी आमदार नरेंद्र पवार यांची मागणी
देहू येथील श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने वारीत अपघाती मृत्यू झाल्यास १ लाख रुपयांचे साहाय्य !
राज्यात मतदार सूचींच्या विशेष सखोल पुनरावलोकनाचा सुधारित कार्यक्रम घोषित !
शासनाच्या परीक्षा ऑनलाईन घेण्याविषयी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना !
आरोग्य, पाणीपुरवठा आणि प्राथमिक शिक्षण समिती सभापती, तसेच उप-सभापती निवड !
विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी अ.भा.वि.प. शिष्टमंडळाकडून विविध मंत्र्यांच्या भेटी ! – अथर्व कुलकर्णी, अ.भा.वि.प.