
मुंबई, २३ मार्च (वार्ता.) – थोडा विलंब झाला आहे; मात्र शासनाने योग्य पाऊल उचलले आहे. आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद करण्यात आली आहे. त्यासह देशांतर्गत चालू असलेली विमानसेवाही बंद करण्यात यावी, याविषयी माझे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणे झाले आहे. माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे की, काही दिवस घरामध्ये बसा. जे चालू आहे, ते जगण्यासाठी चालू आहे. जिवावर उदार होऊन पोलीस बाहेर आहेत, ते गंमत म्हणून आहेत का ? पंतप्रधानांनी आवाहन केलेला ‘जनता कर्फ्यू’ ही केवळ चाचणी होती. यानंतरही लोकांनी ऐकले नाही, तर यापेक्षाही गंभीर पाऊल उचलावे लागेल, अशी चेतावणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी २३ मार्च या दिवशी पत्रकार परिषदेतून दिली.
अर्पणदात्यांनो, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने धर्मकार्यार्थ धन अर्पण करून गुरुतत्त्वाचा लाभ करून घ्या !
पुण्यातील अत्यंत ‘ऐतिहासिक’ वारसा असलेला शून्य मैलाचा दगड आणि परिसराची दुरवस्था !
ठाणे येथे संरक्षण भिंत कोसळून ७ रिक्शांसह दुचाकीची हानी
खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात ठाणे येथे पत्रकारांचे आंदोलन
प्रशासकीय, तसेच लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी लवकरच राज्यात ८८ नवीन महसूल कार्यालये ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
अन्वेषणासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याचे तालिका अध्यक्षांचे निर्देश !