मुंबई, २३ मार्च (वार्ता.) – थोडा विलंब झाला आहे; मात्र शासनाने योग्य पाऊल उचलले आहे. आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद करण्यात आली आहे. त्यासह देशांतर्गत चालू असलेली विमानसेवाही बंद करण्यात यावी, याविषयी माझे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणे झाले आहे. माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे की, काही दिवस घरामध्ये बसा. जे चालू आहे, ते जगण्यासाठी चालू आहे. जिवावर उदार होऊन पोलीस बाहेर आहेत, ते गंमत म्हणून आहेत का ? पंतप्रधानांनी आवाहन केलेला ‘जनता कर्फ्यू’ ही केवळ चाचणी होती. यानंतरही लोकांनी ऐकले नाही, तर यापेक्षाही गंभीर पाऊल उचलावे लागेल, अशी चेतावणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी २३ मार्च या दिवशी पत्रकार परिषदेतून दिली.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > … अन्यथा गंभीर पाऊल उचलावे लागेल ! – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे
… अन्यथा गंभीर पाऊल उचलावे लागेल ! – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे
नूतन लेख
सूरत-चेन्नई महामार्गाची मोजणी ११ जुलैपर्यंत पूर्ण होणार !
आणखी एकही झाड न तोडता एक वर्षात आरे येथे कारशेडचे काम पूर्ण करू ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
शासनाचे बहुमत सिद्ध करण्यासाठी आज मतदान !
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि छत्रपती शिवराय यांच्या पुतळ्यांना मुख्यमंत्र्यांचे अभिवादन !
आषाढी एकादशीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महापूजा !
आषाढी वारीनिमित्त श्री विठ्ठलाचे दर्शन २४ घंटे चालू !