Pakistan’s Reaction On Pahalgam Attack : (म्हणे) ‘पहलगाम येथील आक्रमणाशी आमचा संबंध नाही !’ – पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ

  • पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा

  • भारतियांचाच हात असल्याचा केला आरोप

पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पहलगाम येथील आतंकवादी आक्रमणाशी आमचा काहीही संबंध नाही. उलट यात भारतातील लोकांचाच हात आहे. आम्ही सर्व प्रकारच्या आतंकवादाला विरोध करतो, अशी प्रतिक्रिया पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी व्यक्त केली आहे. या आक्रमणामागे पाकचा हात असल्याच्या होत असलेल्या आरोपावरून त्यांनी हे विधान केले.

ख्वाजा आसिफ पुढे म्हणाले की,

१. भारतातील अनेक राज्यांत सरकारविरोधात रोष आहे. तिथे मणीपूर, नागालँडपासून काश्मीर आणि छत्तीसगड येथे लोक सरकारच्या विरोधात आहेत. भारत सरकार लोकांच्या अधिकारांवर गदा आणत आहे. त्यांचे शोषण करत आहे. अल्पसंख्यांकांचे शोषण होत आहे. याविरोधात लोक उभे राहिले आहेत. आमचा याच्याशी काही संबंध नाही. आम्ही आतंकवादी कृत्यांचे समर्थन करत नाही.

२. कुठल्याही स्थानिक संघर्षात निष्पाप लोकांना लक्ष्य करू नये. सैन्य किंवा पोलीस भारतात सामान्य माणसांवर शस्त्रे उचलत असतील, तर पाकिस्तानला दोष देणे सोपे आहे.

(म्हणे) ‘भारतच पाकमध्ये अशांतता निर्माण करत आहे !’ – आसिफ यांच्या उलट्या बोंबा

भारतावर आरोप करतांना  ख्वाजा आसिफ म्हणाले की, आमच्याकडे प्रतिदिन गोळा होणारे पुरावे आम्ही अनेक वेळा दिले आहेत की, भारत बलुचिस्तान आणि पाकिस्तानच्या इतर भागांत अशांततेला प्रोत्साहन देत आहे. तो अफगाणिस्तानात किंवा इतर कुठूनही पाकिस्तानात अशांतता पसरवत आहे, याचा मोठा इतिहास आहे.

आसिफ यांच्या आरोपावर भारताकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही.

संपादकीय भूमिका

  • एक वेळ मारेकरी मान्य करील की, त्याने हत्या केली; पण पाकिस्तान कधीही मान्य करणार नाही की, त्याने भारतामध्ये आतंकवादी आक्रमणे घडवून आणली ! त्यामुळे आसिफ यांचे विधान असेच असणार आहे. अशा पाकला पुरावे देत बसण्यापेक्षा त्याला पुरण्यासाठीच भारताने प्रयत्न केला पाहिजे !
  • या आतंकवादी आक्रमणात भारतियांचा हात असणार, यात शंकाच नाही; मात्र ते भारतीय जिहादी मुसलमान आहेत आणि ते पाकच्या सांगण्यावरून, शस्त्र पुरवठ्यांवरून गेली ३५ वर्षे काश्मीर आणि भारतातील अन्य ठिकाणी कारवाया करत आहेत, हे तितकेच सत्य आहे !