पहलगाम आक्रमणानंतर संतप्त देशवासियांची मागणी

मुंबई – जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे धर्म विचारून हिंदूंचे प्राण घेणार्या जिहादी आतंकवादी आक्रमणानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. देशाच्या कानाकोपर्यांत लोकांचा राग आणि संताप दिसून येत आहे. प्रत्येक नागरिक आतंकवाद्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी करत आहे. संतप्त लोकांनी पाकिस्तानी अभिनेता फवाद खान याच्या ‘अबीर गुलाल’ या चित्रपटावर देशात बंदी आणण्याची मागणी केली आहे.
काहींनी पहलगाममधील आतंकवादी आक्रमण आणि फवाद खान याची तुलना वर्ष २०१६ मध्ये झालेल्या उरी आक्रमणाशी केली आहे. त्या वेळी फवाद खानचा ‘ऐ दिल है मुश्किल’ हा चित्रपट उरी आक्रमणाच्या एक महिन्यानंतर प्रदर्शित झाला होता. उरी आक्रमणानंतरच पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्यास बंदी घालण्यात आली होती. तथापि वर्ष २०२२ मध्ये ती हटवण्यात आली होती; पण आता पहलगाममधील आतंकवादी आक्रमणाने पुन्हा त्या जखमा ताज्या होऊन संताप वाढला आहे.
‘अबीर गुलाल’ हा चित्रपट ९ मे या दिवशी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटावरून आधीच वाद चालू आहेत. मनसेने (महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ) फवाद खानच्या बॉलिवूडमध्ये परतण्यास विरोध केला होता आणि महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होऊ दिला जाणार नाही, अशी चेतावणी दिली होती.
संपादकीय भूमिकाहिंदूंच्या जीवावर उठलेल्या शत्रूदेशाच्या कलाकारांचे चित्रपट देशात प्रदर्शित होणे, हे सरकारी यंत्रणांना लज्जास्पद ! |