पाक सैन्य आणि हाफीज सईद या दोघांशी जवळचे संबंध असल्याचे उघड

श्रीनगर – पहलगाम येथे झालेल्या आतंकवादी आक्रमणात ‘लश्कर-ए-तोयबा’ या आतंकवादी संघटनेचा सहप्रभारी सैफुल्ला खालिद हा मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आले आहे. भारतीय सैन्यदलाच्या विरोधात गरळ ओकणारा आणि २ फेब्रुवारी २०२६ पर्यंत काश्मीर स्वतंत्र करण्याची भाषा करणारा सैतान सैफुल्ला खालिद हा पाकिस्तानी सैन्याचा अत्यंत जवळचा आहे. भारताचा सर्वांत मोठा शत्रू असणार्या हाफीज सईद याचाही तो निकटवर्तीय आहे.
जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथील बैसारन खोर्यात २२ एप्रिलला झालेल्या आतंकवादी आक्रमणात आतापर्यंत २८ हिंदु पर्यटकांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक पर्यटक गंभीररित्या घायाळ झाले आहेत. या आक्रमणाचे दायित्व ‘लश्कर-ए-तोयबा’च्या ‘टीआर्एफ’ (द रेजिस्टेंस फ्रंट) या पाकिस्तानस्थित शाखेने स्वीकारले आहे.
पहलगाम आतंकवादी आक्रमणाच्या दोन दिवस आधी सैफुल्ला खालिद पाकिस्तानच्या पंजाबमधील कंगनपुर येथे आला होता. तिथे पाकिस्तानी सैन्याचा एक कर्नल जाहिद जरीन खटक याने त्याला जिहादी भाषण देण्यासाठी बोलावले होते. तिथे सैफुल्ला खालिदने पाकिस्तानी सैन्याला भारताच्या विरोधात भरपूर भडकावले. भारतीय सैनिकांची जितकी हत्या कराल, तितका अल्ला तुम्हाला फळ देईल, असे सैफुल्ला खालिद म्हणाला. तेव्हा पाकिस्तानी कर्नलने त्याच्यावर फुलांचा वर्षाव केला.
संपादकीय भूमिकाजिहादी आतंकवाद नष्ट करायचा असेल, तर जिहादी आतंकवादाचा पोशिंदा पाकिस्तानला नष्ट करणे आवश्यक आहे, हे यावरून लक्षात येते ! |