पू. नीलेश सिंगबाळ रामनाथी आश्रमात गेल्यानंतर वाराणसी सेवाकेंद्रातील त्यांच्या कक्षातून साधकांना सुगंध येऊन चैतन्य प्रक्षेपित होणे

‘पू. नीलेश सिंगबाळ काही कारणास्तव रामनाथी आश्रमात गेले. ३०.१०.२०२० या दिवशी त्यांचे वास्तव्य असलेल्या वाराणसी सेवाकेंद्रातील कक्षात गेल्यावर मला सुगंध आला.

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने आयोजित कार्यशाळेतील जिज्ञासूंना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेले मार्गदर्शन

‘जिज्ञासूंना साधनेच्या प्रायोगिक अंगाविषयी माहिती देऊन त्यांच्या साधनेला गती देणे’, या उद्देशाने परात्पर गुरु डॉक्टरांनी जिज्ञासूंना केलेले मार्गदर्शन क्रमशः देत आहोत . . .

ग्रहदोषांमुळे मानवी जीवनावर होणारे दुष्परिणाम सुसह्य होण्यासाठी ‘साधना करणे’ हा सर्वोत्तम उपाय !

साधना केल्याने व्यक्तीचा जीवनाकडे पहाण्याचा दृष्टीकोन पालटतो. त्यामुळे सुख-दुःखाच्या प्रसंगांत ती स्थिर रहाण्याचा प्रयत्न करते. तिला शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, सामाजिक अशा अनेक स्तरांवर लाभ होतो, तसेच तिची आध्यात्मिक उन्नती होते.

दैवी गुणांची खाण आणि चालते-बोलते अध्यात्म विश्‍वविद्यालय असलेल्या सनातनच्या ६९ व्या समष्टी संत पू. (सौ.) अश्‍विनी पवार !

उद्या कार्तिक कृष्ण पक्ष एकादशीला पू. (सौ.) अश्‍विनी पवार यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त पू. शिवाजी वटकर यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये देत आहोत.

श्री. संदीप शिंदे आणि सौ. स्वाती शिंदे एक अद्वितीय पती-पत्नी !

कार्तिक कृष्ण पक्ष नवमी (९.१२.२०२०) या दिवशी रामनाथी आश्रमात पूर्णवेळ साधना करणारे श्री. संदीप शिंदे आणि ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या चि.सौ.कां. स्वाती गायकवाड यांचा शुभविवाह झाला. त्यानिमित्त त्यांच्याविषयी साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. स्वाती शिंदे यांना बालसंत पू. वामन राजंदेकर यांच्या संदर्भात आलेली अनुभूती !

पू. वामन मला (मनातूनच) सांगत होते, ‘अगं, संतांना स्थुलाचे बंधन नसते. एखाद्याच्या मनातील भाव, तळमळ जाणून ते ती कसेही करून पूर्ण करतात.’’ त्यामुळे ‘स्थुलातून मी तिकडे येण्याची आवश्यकता नाही. मी सूक्ष्मातून तुझी इच्छा पूर्ण केली आहे.

सनातनच्या रामनाथी आश्रमात आल्यावर विविध यज्ञ आणि याग यांच्या वेळी उपायांसाठी बसल्यावर आलेल्या अनुभूती

रामनाथी आश्रमात यज्ञ याग यांना नामजपादी उपायांना बसण्याची संधी मिळते. तेव्हा परात्पर गुरुमाऊलीप्रती अपार कृतज्ञता वाटून मन भरून येते. गुरुमाऊली या यज्ञाला उपस्थित रहाण्याची संधी देत आहेत, यासाठी ‘कृतज्ञता’ हा शब्दसुद्धा अपुरा आहे.

गुरुमाऊली, तुम्ही जिंकलात, आम्ही हरलो ।

प्रत्येक साधकाला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले ।
गुरुमाऊली, कितीही जन्म घेतले, तरी गुरुऋण कसे फेडू आपले ॥

रामनाथी आश्रमातील श्री. चेतन हरिहर यांना साधनेविषयी सुचलेली काही सूत्रे

हृदयात गुरुदेवांना विराजमान करायचे असेल, तर हृदयाची स्वच्छता करणे आणि स्वभावदोष अन् अहं यांच्या निर्मूलनासाठी प्रयत्न करणे अनिवार्य आहे. अंतःकरणाची शुद्धी केल्यानंतरच गुरुदेव हृदयरूपी मनमंदिरात विराजमान होतात.’

कु. नंदा नाईक यांना यज्ञाच्या वेळी आलेल्या अनुभूती

६.५.२०१८ या दिवशीच्या  यज्ञाला मी आश्रमात उपस्थित होते. तेव्हा मला यज्ञातून एक देवी बाहेर येतांना दिसली. तो यज्ञ श्री मातंगीदेवीचा होता. मातंगीदेवीला पोपटी रंग आवडतो आणि यज्ञातून बाहेर आलेल्या देवीच्या साडीचा रंगही पोपटी होता.