२६ ऑक्टोबर या दिवशी कोकण रेल्वेमार्गावर ३ घंट्यांचा ‘मेगाब्लॉक’

गुरुवार, २६ ऑक्टोबर या दिवशी कोकण रेल्वेमार्गावर सकाळी ७.३० ते १०.३० या कालावधीत मेगाब्लॉकमुळे धावणार्‍या ३ गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.

विदर्भातील नागरिकांना कोकणात जाण्यासाठी चालू असलेल्या रेल्वेगाड्या नियमित करण्याची मागणी

विशेष गाड्या या नियमितपणे चालू झाल्यास विदर्भातील प्रसिद्ध असलेली नागपुरी संत्री, शेगावची प्रसिद्ध कचोरी याचा स्वाद कोकणवासियांना घेता येणार आहे.

गोवा : मडगाव ‘एक्सप्रेस’च्या स्वयंपाकघरात उंदरांचा सुळसुळाट !

राखीव पोलीस दलाचा प्रतिनिधी म्हणाला, ‘‘रेल्वे रुळाच्या बाजूने ४०० ते ५०० उंदीर आहेत आणि त्यातील ४ ते ५ रेल्वेमध्ये घुसल्यास काय झाले ?’’ संबंधितांवर रेल्वे प्रशासन योग्य ती कारवाई करील का ?

रेल्वेची विनातिकीट प्रवाशांवर कारवाई !

विनातिकीट प्रवास करणार्‍या ४ सहस्र ४३८ प्रवाशांवर १६ ऑक्टोबर या दिवशी मध्य रेल्वेने कारवाई केली. त्यांच्याकडून १६ लाख ८५ सहस्र रुपये दंड वसूल केला आहे.

राज्यात ‘मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा’; मात्र मुख्य शहर असणार्‍या मुंबईतीलच दादर रेल्वेस्थानक अस्वच्छ !

मुंबई, १६ ऑक्टोबर (वार्ता.) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर १ ऑक्टोबर या दिवशी ‘एक तारीख एक तास’ ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली, तसेच राज्यात १५ डिसेंबरपर्यंत ‘मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धेचे आयोजनही करण्यात आले आहे. असे असतांना महाराष्ट्रातील मुख्य शहर आणि त्यात मुख्य रेल्वेस्थानक असलेल्या दादर रेल्वेस्थानकावर मात्र सर्वत्र अस्वच्छता आहे. कचराकुंडी असल्याप्रमाणे दादर रेल्वेस्थानकावर … Read more

नगर येथे आष्टी रेल्वेच्या २ डब्यांना भीषण आग

आग लागण्यामागील कारण स्पष्ट झालेले नाही; मात्र आगीत रेल्वेची प्रचंड हानी झाली. अग्नीशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न चालू होते.

दलाल आणि अनधिकृतपणे प्रवास करणारे यांच्‍यावर मध्‍य रेल्‍वेची कारवाई !

स्‍वातंत्र्याच्‍या ७६ वर्षांनंतरही रेल्‍वेतून अनधिकृत प्रवास केला जाणे म्‍हणजे सर्वपक्षीय शासनकर्त्‍यांनी जनतेला शिस्‍त न लावल्‍याचा परिणाम होय !

ठाणे जिल्‍ह्यातील चिखलोली रेल्‍वेस्‍थानकाच्‍या उभारणीला वेग येणार !

चिखलोली हा परिसर वेगाने विकसित झाल्‍याने तेथील लोकसंख्‍या पर्यायाने प्रवाशांची संख्‍याही वाढली आहे. त्‍यामुळे अंबरनाथ आणि बदलापूर या रेल्‍वेस्‍थानकांच्‍या दरम्‍यान नवे स्‍थानक उभारण्‍याची मागणी होत होती

ठाण्‍यात ३ सहस्र ९२ प्रवासी विनातिकीट !

ठाणे रेल्‍वेस्‍थानकात ९ ऑक्‍टोबर या दिवशी ३ सहस्र ९२ प्रवासी विनातिकीट आढळले. त्‍यांच्‍याकडून ८ लाख ६६ हजारांचा दंड वसूल करण्‍यात आला आहे. या मोहिमेत १२० तिकीट तपासनीस, रेल्‍वे सुरक्षा दलाचे ३० जवान असा फौजफाटा तैनात करण्‍यात आला होता.

हिंदु धर्मप्रेमी गंधर्व ठोंबरे याच्‍या पुढाकाराने कांजूरमार्ग (मुंबई) येथे अपघातग्रस्‍त व्‍यक्‍तीचे प्राण वाचले !

६ ऑक्‍टोबर या दिवशी कांजूरमार्ग येथील रेल्‍वेस्‍थानकावर एक व्‍यक्‍ती रक्‍ताच्‍या थारोळ्‍यात पडलेली होती. त्‍या व्‍यक्‍तीचे डोके फुटले होते आणि ती आजूबाजूच्‍या नागरिकांकडे साहाय्‍य मागत होती;