गोध्रा हत्याकांडाप्रकरणी नरेंद्र मोदी क्षमा मागतील का ? – नाना पटोले, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

राहुल गांधी यांनी चुकीविषयी क्षमा मागितली, ही चांगली गोष्ट आहे; मात्र काँग्रेसने केलेल्या चुकीविषयी जर खरोखरच त्यांना पश्‍चात्ताप वाटत असेल, तर त्यासाठी काँग्रेस काय प्रायश्‍चित्त घेणार ? हेही त्यांनी सांगणे अपेक्षित आहे.

राहुल गांधी यांच्या विरोधातील याचिकेवर भिवंडी न्यायालयात १५ मे या दिवशी सुनावणी

जाहीर सभेत ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी महात्मा गांधी यांची हत्या केली’, असे वादग्रस्त वक्तव्य केल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अपकीर्ती झाल्याचा आरोप करून संघाच्या एका स्थानिक नेत्याने राहुल गांधी यांच्या विरोधात भिवंडी न्यायालयात अवमान याचिका प्रविष्ट केली.

राहुल गांधी यांच्या भाषणाच्या वेळी मुसलमानांनी उपस्थित रहाण्यासाठी इमामाकडून फतवा !

काँग्रेससाठी अशा प्रकारचे किती फतवे काढण्यात आले, तरी आता काँग्रेसला शेवटची घरघर लागली आहे, हे त्यांनी लक्षात ठेवायला हवे !

धर्मनिरपेक्ष धर्मांधांचे काँग्रेसप्रेम जाणा !

मकराना (राजस्थान) येथे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या किसान महापंचायतमध्ये होणार्‍या भाषणासाठी मोठ्या संख्येने मुसलमानांनी उपस्थित रहावे, असा फतवा येथील सुन्नी जामा मशिदीचे इमाम समसुद्दीन कादरी यांनी शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी काढला होता.

मासेमार महिलेने तमिळ भाषेत राहुल गांधी यांच्याकडे तक्रार केली असतांना भाषांतर करतांना तिने कौतुक केल्याचे सांगितले !

काँग्रेसचे मुख्यमंत्री व्ही. नारायण सामी यांचा खोटेपणा ! जे काँग्रेसी शासनकर्ते स्वतःच्या वरिष्ठ नेत्याची फसवणूक करतात, ते जनतेशी कसे वागत असतील ?

(म्हणे) ‘नागपूरचे ‘हाफ चड्डीवाले’ तमिळनाडूचे भविष्य कधीच ठरवू शकत नाहीत !’

केवळ पंचा नेसून, डोक्यावर पांढरी टोपी घालून, कोटवर गुलाब लावून देशाची फाळणी करणार्‍या आणि बहुसंख्य हिंदूंचे भविष्य नष्ट करणार्‍या काँग्रेसवाल्यांनी देशाचे किती भले केले ?, याचे उत्तर राहुल गांधी यांनी दिले पाहिजे !

राहुल गांधी विदेश दौर्‍यावर असल्याने गोव्यातील काँग्रेसच्या नेत्याची निवड लांबणीवर

राहुल गांधी विदेश दौर्‍यावर असल्याने गोव्यातील काँग्रेसच्या नेत्याची निवड लांबणीवर पडली आहे. गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पदाचे त्यागपत्र दिले आहे.

संधीसाधू काँग्रेस !

एवीतेवी लोकशाहीचा टेंभा मिरवणारी काँग्रेस स्वतःचा स्वार्थ साधतांना नेहमीच लोकशाहीचा गळा घोटते, हाही इतिहास आहे. कृषी कायद्याचेच पहायचे झाले, तर हा कायदा लोकशाही मार्गाने सार्वभौम संसदेने संमत केला. तरीही काँग्रेस यास विरोध करून एक प्रकारे लोकशाहीचा अवमानच करत नाही का ?

‘कर्मचार्‍यांवर आक्रमण होण्याच्या भीतीमुळे फेसबूकची मवाळ भूमिका !’ – अमेरिकेतील दैनिक ‘वॉल स्ट्रीट जर्नल’चा थयथयाट !

हिंदूंच्या संघटनांना ‘हिंसक’ ठरवण्याच्या केलेल्या या प्रयत्नांवरून भारत सरकारने ‘वॉल स्ट्रीट जर्नल’वर कायदेशीर कारवाई करण्याचा प्रयत्न केला पाहिजे ! भारतात अशा दैनिकांच्या विक्रीवर आणि संकेस्थळावर बंदी घातली पाहिजे !

केंद्र सरकारचा प्रस्ताव शेतकर्‍यांनी फेटाळला

१४ डिसेंबरला एकदिवसीय उपोषण आणि देशभरात धरणे आंदोलन करणार