पावसाळ्यापूर्वीची खड्डे समस्या ?

पावसाळा चालू होण्यासाठी दीड-दोन मासांचा अवकाश असतांना रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी १५ मेपर्यंत ठेकेदार नेमण्याचे आदेश नाशिक महापालिका आयुक्त
डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी बांधकाम विभागाला दिले. गेल्या पावसाळ्यातही नाशिकमधील बहुतांश रस्ते खड्डेमय बनले होते.

रस्‍त्‍यांची गुणवत्ता पडताळण्‍यासाठी महामंडळाची स्‍थापना !

३ मे या दिवशी मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली झालेल्‍या  मंत्रीमंडळाच्‍या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्‍यात आला.

सातारा येथील राधिका चौकातील नवीन रस्त्याला भगदाड !

निकृष्ट रस्त्यामुळे ठेकेदारावर कारवाईसाठी नागरिकांना वाट का पहावी लागते ? प्रशासनाने चौकशी करून तात्काळ कारवाई करणे आवश्यक आहे.

परशुराम घाट महामार्गाच्या कामासाठी पुन्हा होणार बंद ?

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम चालू आहे. परशुराम घाटातील महामार्गाचे काम पावसाळ्यापूर्वीच पूर्ण करण्यात यावे, या दृष्टीने हा घाटमार्ग एक आठवडाभर (२७ मार्च ते ३ एप्रिल) बंद करावा, अशी मागणी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अभियंत्यांकडून जिल्हाधिकार्‍यांकडे एका पत्राद्वारे करण्यात आली आहे.

मुंबई-गोवा महामार्गाची दुरवस्था : २० मार्चला मुंबईत जनआक्रोश आंदोलन

जनआक्रोश आंदोलन आता गावागावांत आणि वाडीवाडीत वणव्यासारखे पेट घेत आहे. मुंबई-गोवा महामार्गाची इतकी वर्ष दुरवस्था झाली आहे की, त्याकडे सरकार लक्ष देत नाही. हे आम्ही लोकांना पटवून सांगत आहोत.

ओणी अणुस्कुरा रस्त्याच्या कामासाठी १० कोटी रुपयांची तरतूद ! – सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण

‘रस्ता तातडीने होणे आवश्यक होते; परंतु निधीअभावी या रस्त्याचे काम रखडले होते. येणार्‍या अर्थसंकल्पामध्ये या रस्त्यासाठी १० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.’

सातारा शहराच्‍या पश्‍चिम भागात रस्‍त्‍यांची चाळण !

शहराच्‍या पश्‍चिम भागात मनामती चौक, चिमणपुरा पेठ, ढोणे कॉलनी, पापाभाई पत्रेवाला चाळ येथे भुयारी गटार योजनेचे काम चालू आहे. रस्‍त्‍यांचे मध्‍यभागी खोदकाम केल्‍यामुळे या भागांतील सर्व रस्‍त्‍यांची अक्षरशः चाळण झाली आहे.

तुर्भे गावातील रस्त्यांची महापालिकेकडून दुरुस्ती !

वारंवार खड्डे पडणे आणि वारंवार खड्डे बुजवणे हे करत रहाण्यापेक्षा रस्त्यांवर खड्डे पडणारच नाहीत, यासाठी उत्तम दर्जाचे रस्ते बनवणे आणि रस्ते कमकुवत करणार्‍या गोष्टींना आळा घालणे आवश्यक आहे. वारंवार रस्त्याची दुरुस्ती काढण्यामागे आर्थिक राजकारण आहे का, असा कुणाला संशय आला, तर नवल ते काय ?

संभाजीनगर-वैजापूर रस्त्याची दुर्दशा पाहून अभिनेते प्रशांत दामले यांनी काढले प्रशासनाचे वाभाडे !

दिवसेंदिवस सर्वत्रच्या रस्त्यांची दुरवस्था होणे प्रशासनाला लज्जास्पद नव्हे का ?

तुर्भे गावात खड्ड्यांचे साम्राज्य !

तुर्भे गावातील अंतर्गत आणि मुख्य रस्त्यांवर पुष्कळ प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे स्थानिक रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तुर्भे गावामध्ये तीन नगरसेवक, तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष यांचे वास्तव्य आहे.