संपूर्ण भारतीय बनावटीच्या ‘आय.एन्.एस्. विक्रांत’ची चाचणी यशस्वी
संपूर्ण भारतीय बनावटीची पहिली विमानवाहू युद्धनौका ‘आय.एन्.एस्. विक्रांत’ पुढील वर्षी भारतीय नौदलाच्या सेवेत समाविष्ट केली जाणार आहे.
संपूर्ण भारतीय बनावटीची पहिली विमानवाहू युद्धनौका ‘आय.एन्.एस्. विक्रांत’ पुढील वर्षी भारतीय नौदलाच्या सेवेत समाविष्ट केली जाणार आहे.
आम्ही ‘मेरिटाईम कमांड’ आणि ‘एअर डिफेन्स कमांड’ स्थापन करत आहोत, अशी माहिती चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत यांनी ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत दिली आहे.
सिंह या वेळी म्हणाले की, भारतासाठी ही युद्धनौका अभिमानास्पद असून ‘आत्मनिर्भर भारता’च्या दिशेने टाकलेले पाऊल आहे. देशाच्या सागरी सीमांचे रक्षण करण्यास ही युद्धनौका सज्ज असेल.
चक्रीवादळ येणार असल्याची पूर्वसूचना दिलेली असतांनाही जहाज आस्थापनांनी वेळीच दक्षता का घेतली नाही ? जहाज बुडून कर्मचार्यांचे प्राण गेले, या जीवितहानीला उत्तरदायी कोण ?
भारतीय नौदलाच्या आय.एन्.एस. विक्रमादित्य या विमानवाहू युद्धनौकेवर ८ मे या दिवशी सकाळी आग लागल्याची घटना घडली. युद्धनौकेच्या सेलर अॅकोमोडेशन कम्पार्टेमेंट म्हणजेच नौकेवर असणार्यांची रहाण्याची सोय असणार्या भागामध्ये ही आग लागली.
प्रतिदिन १३ ते १५ सहस्र जहाजे हिंदी महासागरामध्ये हालचाली करत असतात. भारताचे भौगोलिक स्थान अतिशय चांगल्या ठिकाणी आहे. भारताने सागरी किनारपट्ट्यांचे योग्य प्रकारे संरक्षण केले, तरच या भौगोलिक स्थितीचा आपल्याला लाभ होईल. त्यासाठी सागरी सुरक्षा अधिक विकसित करणे आवश्यक आहे.’
भारतीय नौदलाने अरबी दमुद्रात मासे पकडण्याच्या नौकेतून ३ सहस्र कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले. या नौकेतून अमली पदार्थांची तस्करी करण्यात येत असल्याची माहिती मिळाल्यावर ही कारवाई करण्यात आली.
चीन किंवा पाकिस्तान हे इतर देशांच्या साहाय्याने भारतात एवढ्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ आणि शस्त्रे पाठवणार होते; परंतु या बोटी किनारपट्टीवर पोचण्यापूर्वीच पकडण्यात आल्या. त्यामुळे एक मोठा घातपात टळला.
भारताने अमेरिकेच्या या दादागिरीला भीक न घालता त्याला जाब विचारायला हवा ! भारताने चीन आणि पाक यांच्यासह आता अमेरिकेलाही धाकात ठेवायला हवे, हे यावरून लक्षात येते ! असा देश भारताचा कधीतरी मित्र राष्ट्र होऊ शकतो का ?
‘सायलेंट किलर’ म्हणून ओळखली जाणारी ‘आयएन्एस् करंज’ ही अत्याधुनिक पाणबुडी १० मार्च या दिवशी नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात आली. मुंबई येथील पश्चिम कमांड नौदलाच्या मुख्यालयामध्ये नौदलप्रमुख अॅडमिरल करमवीर सिंग यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.