
ठाणे – येथील वागळे इस्टेट भागातील इंदिरानगर परिसरात २४ जूनच्या मध्यरात्री संरक्षण भिंत कोसळून ७ रिक्शा आणि एका दुचाकीची हानी झाली आहे. सुमारे ७ फूट उंच आणि १० फूट लांब भिंत रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांवर पडली. सुदैवाने या दुर्घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलीस, ठाणे महानगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापन पथक आणि अग्नीशमन दलाचे पथक यांनी घटनास्थळी जाऊन ‘जेसीबी’च्या साहाय्याने ढिगारा हटवून अडकलेली वाहने बाहेर काढली. यात रिक्शांच्या पुढील भागाची हानी झाली आहे.
पुण्यातील अत्यंत ‘ऐतिहासिक’ वारसा असलेला शून्य मैलाचा दगड आणि परिसराची दुरवस्था !
खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात ठाणे येथे पत्रकारांचे आंदोलन
प्रशासकीय, तसेच लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी लवकरच राज्यात ८८ नवीन महसूल कार्यालये ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
अन्वेषणासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याचे तालिका अध्यक्षांचे निर्देश !
देहू ते आळंदी पालखी मार्ग ‘संतभूमी’ म्हणून घोषित करा ! – अभय टिळक, माजी मुख्य विश्वस्त, आळंदी देवस्थान
शिर्डी येथे ७०० किलो भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाचे पेढे जप्त !