नगराध्यक्ष आणि सरपंच पदाच्या निवडणुका थेट जनतेतून करणारे सुधारणा विधेयक विधानसभेत संमत !

सरपंच आणि नगराध्यक्ष या पदांची निवडणूक थेट जनतेमधून करणारे विधेयक २२ ऑगस्ट या दिवशी विधानसभेत संमत करण्यात आले.

महानंद दूध महासंघावर प्रशासकाची नियुक्ती करणार !

मुंबई येथील महाराष्ट्र राज्य दूध महासंघ मर्यादित असलेल्या महानंद दूध महासंघात अपप्रकार आणि उतरती कळा लागण्याला संचालक मंडळ उत्तरदायी आहे. महासंघातील अनियमिततेविषयी सरकार बघ्याची भूमिका घेणार नाही.

बेरोजगारांच्या नोंदणीविषयी सकारात्मक विचार करण्यात येईल ! – मंगलप्रभात लोढा, कौशल्य विकास मंत्री

बेरोजगारांच्या नोंदणीविषयी सकारात्मक विचार करण्यात येईल. कौशल्य विकास विभागाने पोर्टल सिद्ध केले असून त्यात बेरोजगारांची नोंदणी केली जाते, तसेच विविध उद्योग-आस्थापने तिथे नोंदणी करू शकतात.

नगराध्यक्ष आणि सरपंच थेट जनतेमधून निवडून दिल्यास कारभारामध्ये पारदर्शकता येईल ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

सरपंचपदाची निवडणूक थेट जनतेमधून घ्यावी, यासाठी राज्यातील ९ सहस्र ग्रामपंचायतींचे ठराव आले आहेत. महाराष्ट्र सरपंच समितीनेही ही मागणी केली आहे. हा आमचा स्वत:चा अजेंडा नाही. जनतेचे जे मत आहे, तेच आमचे मत आहे.

अतिरिक्त पोलीस महासंचालक पातळीच्या समकक्ष अधिकार्‍यांकडून विनायक मेटे यांच्या मृत्यूचा अहवाल मागितला जाईल ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

विनायक मेटे यांचा मृत्यू घातपाताने झाला कि अपघातामुळे, याविषयी त्यांचे कुटुंबीय आणि जनता यांच्या मनामध्ये कोणताही संशय राहू नये, यासाठी या घटनेच्या चौकशीचे दायित्व विशेष पोलीस पथकाकडे देण्यात आले आहे.

नागपाडा (भायखळा) येथे गणपतीच्या मूर्तीवर अंडी फेकणार्‍या धर्मांधाला अटक !

पोलीस बंदोबस्त असतांनाही हिंदूंच्या धार्मिक कार्यक्रमावर आक्रमण करणार्‍या धर्मांधांना कायदा-सुव्यवस्थेचा धाकच उरला नाही, हे स्पष्ट होते. त्यांना कायद्याचा धाक वाटावा, यासाठी हिंदूंनीच आता पोलिसांवर दबाव आणणे आवश्यक !

भूतकाळातील वक्तव्यांचा त्रास तुम्हाला नक्कीच भोगावा लागेल ! – अनुपम खेर, अभिनेते

जर तुम्ही भूतकाळात काही म्हणाला असाल, तर त्याचा त्रास तुम्हाला वर्तमान स्थितीत नक्कीच भोगावा लागेल, असे विधान अभिनेते अनुपम खेर यांनी केले.

महाराष्ट्र राज्य सरकारकडून उंच इमारतींच्या अग्नीसुरक्षेसाठी १३ वर्षांनी समिती स्थापन !

अग्नीसुरक्षेच्या संदर्भात अधिसूचना काढल्यावर १३ वर्षांनंतर अग्नीसुरक्षेसाठी समिती स्थापन केली जाणे, इतकी उदासीनता आतापर्यंतच्या सरकारांकडून अपेक्षित नाही !

पठाण’ चित्रपटाच्या ‘प्रमोशन’च्या मुलाखतीत अभिनेते शाहरूख खान यांच्याकडून पुन्हा पाकिस्तानप्रेम व्यक्त !

वारंवार पाकिस्तानचे समर्थन करणार्‍या अशा अभिनेत्यांच्या चित्रपटांवर बहिष्कार घालून राष्ट्रप्रेमी जनतेने त्यांना रोखठोक प्रत्युत्तर द्यावे !

राज्यात अतीवृष्टीमुळे १२६ जणांचा मृत्यू !

या वर्षी झालेल्या अतीवृष्टीमुळे राज्यातील ४४ घरांचे पूर्णत:, तर ३ सहस्र ५३४ घरांची अंशत: हानी झाली आहे. अतीवृष्टीमुळे आतापर्यंत राज्यातील १२६ नागरिकांनी स्वत:चे प्राण गमावले आहेत. १ जूनपासून झालेल्या अतीवृष्टीमुळे राज्यातील २९ जिल्हे आणि ३५२ गावे प्रभावित झाली.