हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक यांच्याकडून द्वेषाचे राजकारण कधी थांबणार ?

अधिवेशनाचा वेळ हा नवीन आणि प्रलंबित विकासकामे पुढे सरकणे अन् नवीन कायदे सिद्ध करणे, जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणे यांसाठी देणे अपेक्षित आहे.

दिवंगत आमदार गणपतराव देशमुख यांचा विधानभवनाच्या परिसरात पूर्णाकृती पुतळा उभारण्याची विधान परिषदेतील सर्वपक्षीय आमदारांची मागणी !

दिवंगत आमदार गणपतराव देशमुख यांच्या कार्याचे स्मरण भावी पिढीला व्हावे, यासाठी विधानभवनाच्या परिसरात त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याची मागणी विधान परिषदेतील सर्वपक्षीय आमदारांकडून करण्यात आली आहे.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अद्यापही अपूर्ण ! – भाजप आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अनेक कंत्राटदारांनी ६० टक्क्यांपर्यंत न करणे हे धक्कादायक आहे ! अशा प्रकारे विलंबाने काम करणार्‍या ठेकेदारांवर शासनाने काय कारवाई केली तेही सांगणे अपेक्षित आहे !

आपण कुत्री, मांजर आणि कोंबडी यांचे प्रतिनिधित्‍व करत नाही, याचे आमदारांनी भान ठेवावे ! – अजित पवार, उपमुख्‍यमंत्री

भारताला स्‍वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली, तरी अजूनही लोकप्रतिनिधींचे वागणे आदर्श असायला हवे, असे विधीमंडळात उपमुख्‍यमंत्र्यांना सांगावे लागते, हे सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना लज्‍जास्‍पद आहे. असे लोकप्रतिनिधी जनतेशी कसे वागत असतील, याचाही विचार न केलेला बरा !

पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूर येथे होण्याची शक्यता !

राज्याचे पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूर येथे २८ फेबु्रवारी २०२२ या दिवशी होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे मंत्री, आमदार यांनी आणि देवेंद्र फडणवीस यांनी तशी मागणी केली होती.

‘सरकार हरवले आहे’, असा संदेश लिहिलेला सदरा घालून भाजप आमदार मंगेश चव्हाण यांचा विधानभवनात प्रवेश !

आमदार मंगेश चव्हाण म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार जनतेच्या प्रश्नावर पूर्णपणे अपयशी ठरले आहे. राज्यात विजेचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला असतांना सरकार त्यावर जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे.

इतर मागासवर्गीय समाजाचे राखीव आरक्षण वगळून निवडणुका घेण्यात येऊ नयेत !

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे प्रकरण, विधीमंडळात एकमताने ठराव संमत

विधीमंडळात प्रवेश करण्यापूर्वी प्रतिदिन कोरोनाची चाचणी केली जाईल ! – आदित्य ठाकरे, पर्यावरणमंत्री

राज्याचे हिवाळी अधिवेशन सध्या मुंबईत चालू आहे. असे असतांना विधीमंडळ परिसरात कोरोनाचा शिरकाव झाला असून १ मंत्री आणि १ आमदार यांसह एकूण ३२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

पीडितेलाच अपराधी समजणारी वागणूक आधी पालटायला हवी !

ज्या वेळी महिला अत्याचाराची घटना घडते, त्या वेळी संबंधित महिलेला मिळणारी वागणूक अयोग्य असते. तिला पोलीस ठाण्यामध्ये मिळणारी वागणूक पालटायला हवी. पीडित महिलेला अपराधी असल्याची वागणूक मिळणे चुकीचे आहे.

शासकीय प्रकल्पांसाठीच्या जमिनी शेतकर्‍यांकडून अल्प दरात खरेदी करून नफा कमवणारी मोठी यंत्रणा राज्यात कार्यरत !

विधान परिषदेत तीव्र पडसाद !