कार्तिक शुक्ल चतुर्दशी म्हणजे हरिहरांचे मीलन !
उत्तरेत वा दक्षिणेत शैव आणि वैष्णव यांची भांडणे असली तरी, भागवत धर्माने आणि वारकरी संप्रदायाने सर्व मतभेद मिटवले अन् संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम सांगतात, त्याप्रमाणे एकाच विठोबाला शिव आणि विष्णु यांच्या स्वरूपात पहाण्यास जनतेस शिकवले !