‘बर्ड फ्ल्यू’चा संसर्ग आणि प्रसार होऊ नये, यासाठी सतर्कता बाळगण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे आवाहन

राज्यातील परभणी जिल्ह्यात कोंबड्या आणि कावळे यांचा ‘बर्ड फ्ल्यूू’ च्या संसर्गाने मृत्यू झाल्याचे शासनाने घोषित केले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर या रोगाचा संसर्ग आणि प्रसार होऊ नये, यासाठी जिल्ह्यातील कुक्कुटपालक आणि नागरिक यांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले आहे.

शाकंभरी नवरात्रोत्सवात मोजके सेवेकरी आणि मानकरी यांच्या उपस्थितीत होणार धार्मिक विधी

आठ दिवसांच्या मंचकी निद्रेनंतर २१ जानेवारीच्या पहाटे श्री तुळजाभवानीदेवी सिंहासनावर विराजमान होईल.

महिलेने केलेले सर्व आरोप खोटे असून माझी अपकीर्ती करणारे आहेत ! – धनंजय मुंडे, सामाजिक न्याय मंत्री

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने अत्याचाराचे आरोप करून मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात मुंडे यांच्याविरुद्ध तक्रार प्रविष्ट केली होती; मात्र मुंडे यांनी या महिलेचे आरोप फेटाळून लावले आहेत.

राज्य कोरोना लसीकरणासाठी सिद्ध

लसीकरणासाठी प्राधान्यक्रमाने गट ठरवण्यात आले असून पहिल्या गटात हेल्थ केअर वर्कर्सचा समावेश आहे.

खारेपाटण ते झाराप महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम २ मासांत होणार ! – खासदार विनायक राऊत

महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले असून नांदगाव, तळेरे, कासार्डे, कणकवली या ठिकाणच्या पुलांची कामे शिल्लक आहेत. ही कामे येत्या मासात मार्गी लागल्यानंतर दोन मासांत महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम लोकार्पणासाठी सज्ज होईल, अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली.

महाराष्ट्राचे अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांची एन्.सी.बी.कडून चौकशी

या प्रकरणाची सरकारने तात्काळ नि:पक्ष चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, असेच जनतेला वाटते !

भाजपचे उपमहापौर राजेश काळे पक्षातून बडतर्फ

उपमहापौर राजेश काळे यांना भाजप पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे. राजेश काळे यांच्यावर महापालिका आयुक्त आणि उपायुक्त यांना खंडणीसाठी धमकावणे, शिवीगाळ करणे, सरकारी कामात अडथळा आणणे, असे आरोप उपायुक्त धनराज पांडे यांनी दिलेल्या तक्रारीत करण्यात आले होेते.

प्रस्तावित आयआयटी प्रकल्प रहित केल्याचे शासनाने लेखी आश्‍वासन द्यावे ! – मेळावली ग्रामस्थ

शेळ-मेळावली येथील प्रस्तावित आयआयटी प्रकल्प रहित केल्याचे शासनाने लेखी आश्‍वासन द्यावे. ग्रामस्थांना शासनाचे तोंडी आश्‍वासन नको, तसेच शासनाने ग्रामस्थांच्या विरोधात प्रविष्ट केलेल्या सर्व तक्रारी मागे घ्याव्यात, अशी मागणी शेळ-मेळावली ग्रामस्थांनी केली आहे.

रेखा जरे हत्या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात यावा !

येथील ‘यशस्विनी ब्रिगेड’च्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे अद्याप पसार असून त्याचा अटकपूर्व जामीन जिल्हा न्यायालयाने फेटाळला आहे. तरीही तो अद्याप पोलिसांना सापडलेला नाही. यामुळे तपास रेंगाळला असून संशयाला वाव मिळत आहे.

आगारातून सुटणार्‍या वस्तीच्या बसगाड्या त्वरित चालू करा ! – मंगेश तळवणेकर, माजी शिक्षण आणि आरोग्य सभापती

सावंतवाडी तालुक्यातील सातार्डा येथून सकाळी ६ वाजता सुटणारी साटेली, कोंडुरे, आरोस बाजार, रोणापाल, मडुरा, शेर्ला ते बांदा ही बसगाडी शाळेच्या आणि महाविद्यालयाच्या तसेच गोरगरीब कामगार, छोटे-मोठे भाजी विक्रेते यांच्यासाठी चालू होती.