निपाणी येथील श्री अंबाबाई मंदिरातील दानपेटीची चोरी

येथील बडमंजी ‘प्लॉट’मध्ये असणार्‍या श्री अंबाबाई मंदिरातील दानपेटी फोडून १० सहस्रांहून अधिक रुपयांची चोरी केल्याची घटना २९ नोव्हेंबर या दिवशी उघडकीस आली. याशिवाय बसस्थानक परिसरातील मद्यालयातही चोरीची घटना घडली आहे.

यवतमाळ जिल्हा कारागृहातील बंदीवानाकडून पोलीस अधिकार्‍यावर प्राणघातक आक्रमण

शहराच्या मध्यवर्ती असलेल्या ब्रिटीशकालीन जिल्हा कारागृह वर्ग १ येथे १ डिसेंबर या दिवशी सकाळी कारागृह अधीक्षक (श्रेणी २) प्रत्येक बॅरेकमध्ये जाऊन बंदीवानांची पडताळणी करत होते. तेव्हा त्यांच्यावर राहुल उपाख्य सिन्नू शिंदे या बंदीवानाने दाढी करण्याच्या कारणावरून प्राणघातक आक्रमण केले.

बारामती तालुक्यात सव्वा मासाच्या बालिकेला आईनेच मारल्याची धक्कादायक घटना

सव्वा मासाच्या बाळाच्या मृत्यूच्या प्रकरणी बाळाची आई दीपाली संजय झगडे हिच्यावर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. बारामती तालुक्यातील माळेगाव येथील चंदननगर भागात ही घटना घडली.

२६ लाख रुपयांचे चंदन शिक्रापूर (जिल्हा पुणे) येथे स्थानिक गुन्हे शाखेकडून कह्यात

मुळशी आणि भोसरी परिसरातून चोरून आणलेला अनुमाने २६ लाख रुपयांचा चंदनाचा साठा घेऊन नगर येथे निघालेल्या चंदन तस्करांना स्थानिक गुन्हे शाखेने १ डिसेंबरच्या मध्यरात्री शिक्रापूर येथे पकडले आहे.

नाशिक येथील नगरसेवक भगवान कटारिया यांच्यावर धर्मांधाकडून आक्रमण

नगरसेवक भगवान कटारिया यांच्यावर अस्लम सईद सैय्यद या संशयितIने आक्रमण करत त्यांना शिवीगाळ केली.

श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या अंबरनाथ, बदलापूर विभागाच्या वतीने किल्ले स्पर्धेचे आयोजन

मुलांमध्ये जनजागृती होण्याच्या दृष्टीने श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या अंबरनाथ, बदलापूर विभागाच्या वतीने गड-किल्ले स्पर्धेचे यंदाही आयोजन.

ठाणे येथील प्रख्यात मामलेदार मिसळ उपाहारगृहाचे मालक लक्ष्मण मुर्डेश्‍वर यांचे निधन

येथील प्रख्यात मामलेदार मिसळ अर्थात तहसील कचेरी कँटीनचे मालक लक्ष्मण मुर्डेश्‍वर (वय ८४ वर्षे) यांचे १ डिसेंबर या दिवशी निधन झाले. त्यांच्यावर ठाणे येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचार चालू होते. लक्ष्मण मुर्डेश्‍वर हे सनातन संस्थेचे हितचिंतक आणि दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचक होते.

बांदा तपासणी नाक्यावर पावणे चार लाख रुपयांचे अवैध मद्य पोलिसांच्या कह्यात

गोव्याहून नियमितपणे महाराष्ट्रात मद्याची अवैध वाहतूक होत असते ! पोलीस त्या वेळी थातुर-मातुर कारवाई करतात आणि सोडून देतात. त्यामुळे वर्षानुवर्षे कारवाई करूनही वाहतूक थांबत नाही ! त्यामुळे अशा कारवाया ‘तू मारल्यासारखे कर, मी रडल्यासारखे करतो’, अशा प्रकारच्या आहेत का, अशी शंका येते !

सिंधुदुर्गातील सर्व सत्तास्थानांवर भगवा फडकवा ! – अरुण दूधवडकर, जिल्हा संपर्कप्रमुख, शिवसेना

कणकवली तालुका शिवसेनेच्या माध्यमातून येथील मातोश्री मंगल कार्यालयात दूधवडकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून या अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. या वेळी जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.