नेपाळमध्ये होणार मध्यावधी निवडणुका !
नेपाळमध्ये पंतप्रधान के.पी. शर्मा ओली आणि विरोधी पक्ष यांनी स्वतंत्रपणे राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांना निवेदन देऊन सरकार स्थापन करण्याचा दावा केला होता.
नेपाळमध्ये पंतप्रधान के.पी. शर्मा ओली आणि विरोधी पक्ष यांनी स्वतंत्रपणे राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांना निवेदन देऊन सरकार स्थापन करण्याचा दावा केला होता.
नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली हे संसदेत बहुमत सिद्ध करण्यात अपयशी ठरल्याने त्यांचे सरकार कोसळले. ओली यांना २३२ पैकी केवळ ९३ मते पडली, तर १२४ मते त्यांच्या विरोधात पडली. मतदानाच्या वेळी १५ खासदार तटस्थ, तर ३५ खासदार अनुपस्थित राहिले.
नेपाळमध्ये करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. ‘कोरोनाच्या संसर्गावर वेळीच नियंत्रण न आणल्यास नेपाळमधील स्थिती भारतापेक्षाही अधिक वाईट होईल’, अशी चेतावणी तज्ञांनी दिली आहे. नेपाळ सरकारने साहाय्यासाठी इतर देशांना आवाहन केले आहे.
‘जर भ्रष्टाचार चालू राहिला, तर आणखी कठोर कारवाई केली जाईल आणि त्यासाठी नेपाळ, तसेच प्रांतीय सरकार यासाठी उत्तरदायी असेल’, अशी चेतावणीही जनतांत्रिक तराई मुक्ती मोर्चा या संघटनेने दिली आहे.
के.पी. शर्मा ओली यांनी पक्षांतर्गत राजकीय आव्हान मिळाल्यावर संसद विसर्जित केली होती.
नेपाळची सत्ता हातातून निसटू पहात असल्याने आता कम्युनिस्टांनाही देव आठवू लागला आहे ! ओली यांच्या या दिखाऊपणाला नेपाळी हिंदूंनी न भुलता राजेशाही आणि हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे !
नेपाळचे माजी पंतप्रधान पुष्पकमल दहल प्रचंड यांच्या नेतृत्वाखालील नेपाळ कम्युनिस्ट पक्षाच्या फुटीर गटाने पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांची पक्षाच्या सर्वसाधारण सदस्यपदावरून हकालपट्टी केली.
नेपाळमध्ये संसद विसर्जित करण्यात आल्याने पुन्हा निवडणुका होणार आहेत आणि त्यात विजयी होण्यासाठी ओली यांना भारताचे कौतुक अन् चीनवर टीका करून मते मिळवायची आहेत, त्याच अनुषंगाने ते अशी विधाने करत आहेत, हे लक्षात घ्यायला हवे !
ओली यांच्या सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप, वाढती बेरोजगारी आणि सरकारची अकार्यक्षमता यांवरून टीका होत असल्याने ते लपवण्यासाठी ओली भारतासमवतेच्या सीमावादाचे सूत्र उपस्थित करत असल्याचा दावा करण्यात येत आहे.
चीननेदेखील नेपाळला लस पुरवठा करण्याचे आश्वासन दिले आहे; मात्र चीनपेक्षा भारतावर अधिक विश्वास व्यक्त करून नेपाळ चीनला धक्का देण्याच्या सिद्धतेत असल्याचे म्हटले जात आहे !