
काठमांडू (नेपाळ) – नेपाळमध्ये करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. ‘कोरोनाच्या संसर्गावर वेळीच नियंत्रण न आणल्यास नेपाळमधील स्थिती भारतापेक्षाही अधिक वाईट होईल’, अशी चेतावणी तज्ञांनी दिली आहे. नेपाळ सरकारने साहाय्यासाठी इतर देशांना आवाहन केले आहे.
Covid-19: Second wave strikes Nepal; 14 districts declared hotspots https://t.co/8dt6qLSC6V
— TOI World News (@TOIWorld) April 15, 2021
१. नेपाळमध्ये सध्या प्रत्येकी १ लाख लोकांमागे २० जणांना कोरोनाची लागण होत आहे. हीच स्थिती भारतात २ आठवड्यांपूर्वी होती. मागील आठवड्यात करण्यात आलेल्या कोरोना चाचणीत ४४ टक्के लोक कोरोनाबाधित आढळले आहेत.
२. नेपाळच्या आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते डॉ. समीर अधिकारी यांनी सांगितले की, ३ कोटी लोकसंख्या असलेल्या नेपाळमध्ये एक मासापूर्वी प्रतिदिन १०० च्या आसपास कोरोनाबाधित आढळत होते. २ दिवसांपूर्वी नेपाळमध्ये एकाच दिवशी ८ सहस्र ६०० हून अधिक बाधित आढळले. नेपाळमध्ये वाढत असणार्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
भारतामुळे संसर्ग वाढत असल्याचा आरोप
भारत-नेपाळ सीमा चालू आहेत. अनेक भारतीय हवापालट करण्यासाठी आणि चांगले उपचार घेण्यासाठी नेपाळमध्ये आले होते. त्यामुळे नेपाळमधील संसर्ग वाढला आहे, असा दावा एका अधिकार्याने केला.
‘एक भक्कम पाकिस्तान अमेरिकेच्या हितासाठी अत्यंत आवश्यक !’ – अमेरिका
महिला रुग्णाकडून लाच घेतांना कामथे उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरला पकडले
Trump Warns Iran : आमच्या सैनिकांना हात जरी लावला, तरी युद्ध पेटेल !
भारत बळजबरीने घुसखोरांना बांगलादेशात ढकलत आहे ! – Bangladesh Allegation
पंतप्रधान मोदी मला फार आवडतात, ते माझे चांगले मित्र ! – Donald Trump
भारतावर दबाव आणणे जागतिक स्थिरतेसाठी अत्यंत घातक ! – Russia President Putin