बुरहानपूर (मध्यप्रदेश) येथील घटना
बुरहानपूर (मध्यप्रदेश) – जिल्ह्यातील एका गावात बाबा नवनाथांच्या समाधीवरून हिंदू आणि मुसलमान यांच्यात हिंसाचार झाला. या वेळी दगडफेक आणि गोळीबार करण्यात आला. पोलिसांनी कारवाई करून परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेमुळे समाधी हडपण्याचा मुसलमानांचा डाव हिंदूंनी उधळून लावल्याचे म्हटले जात आहे.
हिंदूंचे म्हणणे येथे बाबा नवनाथाची समाधी आहे, तर मुसलमानांचा दावा आहे तो दर्गा (थडग्याच्या ठिकाणी करण्यात आलेले बांधकाम) आहे. येथे हिंदूंनी समाधीच्या परिसराला भगवा रंग दिला. त्याविरोधात मुसलमानांनी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलीस आणि प्रशासन येथे आले होते. त्यांनी येथे बैठक आयोजित केली होती. तेव्हा झालेल्या वादातून हाणामारी झाली. पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांना प्रथम यश मिळाले नाही. या वेळी दोन्ही बाजूंकडून दगडफेक करण्यात आली. यानंतर पोलिसांनी अतिरिक्त पोलीस मागवून परिस्थिती नियंत्रणात आणली. या हाणामारीत ४ जण घायाळ झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत. सध्या गावात तणाव असून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
संपादकीय भूमिकामध्यप्रदेशात भाजपचे सरकार असल्याने त्यांनी धर्मांधांचा अशा प्रकारचा कोणताही डाव यशस्वी होऊ देऊ नये, असेच हिंदूंना वाटते ! |

गोव्यातून सुमारे ५ सहस्र वारकर्यांचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
शासनाची सर्व ओळखपत्रे भारतीय नागरिकत्वाचा पुरावा मानावा ! – प्रा. नागनाथ स्वामी, ‘जागृत ग्राहक राजा’ संस्था
जोधपूर (राजस्थान) येथील श्री सच्चियायमातेला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी केली प्रार्थना !
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !
वारीतील दुर्घटनाग्रस्त वारकर्यांसाठी शासन राबवणार ‘विठ्ठल-रखुमाई वारकरी योजना’ !