मुसलमान धर्मगुरूंनी अशा घटना रोखण्याविषयी बोलावे, असेही केले आवाहन
हरिद्वार (उत्तराखंड) – मुसलमानांकडून खाद्यपदार्थांमध्ये थुंकणे, लघवी करणे, घाण करणे इत्यादी घटनांमुळे इस्लाम आणि कुराण यांचा प्रचार होत नाही. अशा घटनांमुळे मुसलमान आणि कुराण यांची अपकीर्ती होत आहे. मुसलमान धर्मगुरु अशा घटनांविषयी मौन बाळगतात. अशा घटना रोखण्यासाठी त्यांनी बोलायला हवे. अशा घटनांना कडाडून विरोध झाला पाहिजे. या घटना सुसंस्कृत मानवी समाजाला काळिमा फासणार्या आहेत, असे विधान योगऋषी रामदेवबाबा यांनी येथे केले. ते दसर्यानिमित्त कन्या पूजनाच्या वेळी बोलत होते.