
इंफाळ – गेल्या सव्वा वर्षाहून अधिक काळ धुमसत असलेल्या मणीपूरमधील हिंसाचार अद्यापही थांबलेला नाही. आसाम सीमेला लागून असलेल्या जिरिबाम जिल्ह्यातील हिंसाचारात ७ सप्टेंबरला ६ जणांचा मृत्यू झाला. मणीपूरमधीलच इंफाळ खोर्यातील बिष्णूपूर येथे ६ सप्टेंबरला झालेल्या रॉकेट आणि ड्रोन आक्रमणांना प्रत्युत्तर म्हणून जिरिबाम येथील आक्रमण करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मणीपूर राज्यात मागील ७ दिवसांत हिंसाचार वाढला आहे. यामध्ये ८ जणांचा मृत्यू झाला असून १५ हून अधिक जण घायाळ झाले आहेत.
बिष्णूपूर येथील आक्रमणात एका पुजार्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर जिरिबाम येथील एका खेड्यावर आक्रमण करण्यात आले. त्यानंतर तेथील २ गट समोरासमोर आले. या घटनेंतर मुख्यमंत्री बीरेनसिंह यांनी मंत्रीमंडळाची तातडीची बैठक बोलावून राज्यपालांना राज्यातील स्थितीविषयी सविस्तर माहिती दिली.
संपादकीय भूमिकामणीपूरमध्ये जोपर्यंत ख्रिस्ती कुकी आतंकवाद्यांना धडा शिकवला जात नाही, तोपर्यंत तेथे शांतता नांदणार नाही ! |
२७ जूनला ‘लव्ह जिहाद’ची नवी भयावहता आणि उपाययोजना यांवर इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथे विशेष व्याख्यान !
कायदा असूनही गोवंश हत्या रोखण्यासाठी झगडावे लागते ! – खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी
गेल्या २४ घंट्यांत उघड झाल्या लव्ह जिहादच्या ४, तर धर्मांतराच्या २ घटना !
(म्हणे) ‘सरकार आता भाजपच्याच भूमिकेची री ओढत आहे का ?’ : Udhayanidhi Stalin
Indus Water Treaty Crisis : सिंधू जल वाटप करारावरून पाकने काश्मीरमधील सीमेवर तैनात केले ३५ ड्रोनविरोधी युनिट !
गायीला राष्ट्रमाता घोषित करा ! – पू. किशोरशास्त्री दवे