गहाळ झालेल्या दागिन्यांची चौकशी करावी, तसेच निकृष्ट लाडू बनवणार्या संस्थेवर कारवाई करण्याची मागणी !

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या कारभारात अनागोंदी असल्यामुळे ही समिती विसर्जित करावी, या मागणीसाठी पंढरपूर येथे १ जानेवारी या दिवशी बेमुदत धरणे आंदोलन चालू करण्यात आले आहे. गहाळ झालेल्या दागिन्यांची चौकशी करावी, निकृष्ट लाडू बनवणार्या संस्थेवर कारवाई करण्याची मागणीही या वेळी करण्यात आली आहे, तसेच मंदिरातील अन्य अपप्रकारांच्या विरोधात बेमुदत धरणे आंदोलन चालू करण्यात आले आहे. सामाजिक संघटनेच्या वतीने संत नामदेव पायरी ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत मोर्चाही काढण्यात आला आहे.
सौजन्य शिवसंदेश न्यूज
संपादकीय भूमिकाआंदोलन करून अशी मागणी करण्याची वेळी भाविकांवर येऊ नये. सरकारने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष घालून भाविकांना आश्वस्त करणे आवश्यक ! |
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित
आडाळी ‘एम्.आय.डी.सी.’मध्ये अवैधरित्या झालेल्या उत्खननाची उच्चस्तरीय चौकशी चालू !
मासेमारांना खोल समुद्रातील संपर्कासाठी ‘सॅटेलाईट फोन’ उपलब्ध होण्यासाठी सरकारचे प्रयत्न !